शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

१३ दिवस अन् १८८ कोटी खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठीचा १८८. ७१ कोटींचा निधी १३ दिवसांत खर्च करण्याचे आव्हान जिल्हा नियोजन समितीपुढे आहे. ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठीचा १८८. ७१ कोटींचा निधी १३ दिवसांत खर्च करण्याचे आव्हान जिल्हा नियोजन समितीपुढे आहे. समितीला मिळालेल्या ३३० कोटी निधीपैकी ४६.१५ टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरीत ५४ टक्के निधीसाठी प्रस्तावांवर जलद गतीने काम करण्याची लगीनघाई सुुरू आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि सगळी विकास कामे ठप्प झाली. त्याकाळात सर्वाधिक निधी कोरोनावर खर्च झाल्याने राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीला देण्यात येणाऱ्या रकमेत कपात केली आणि केवळ ३३ टक्के निधी देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी प्रस्ताव मागवणे, त्यांची प्रशासकीय मान्यता अशा तांत्रिक बाबींना घाई केली नाही. मात्र अचानकच ८ डिसेंबरला शासनाने नियोजनला सगळा निधी देण्याचे जाहीर केले आणि १५ डिसेंबरला कोल्हापूरसाठीचा नियोजित ३३० कोटींचा निधी वर्गही झाला. अवघ्या तीन महिन्यांत ३३० कोटी कसे खर्च करायचे, असे समितीपुढे आव्हान होते.

त्यातच जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने तालुक्यांमध्ये आचारसंहिता होती. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत नियोजन समितीने वार्षिक योजनेतील १५२.२९ कोटी इतका निधी विविध विकासकामांवर खर्च केला आहे. ही टक्केवारी ३३० कोटींच्या तुलनेत ४६.१५ टक्के इतकी आहे. त्यापैकी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ३३ कोटींचा निधी वापरण्यात येत आहे. आता उरलेल्या १३ दिवसांत १८८.७१ कोटी इतका मोठा निधी नियोजनला संपवायचा आहे. त्यासाठी विभागात विविध कामांचे प्रस्ताव मागवणे, त्यांची मान्यता, वर्कऑर्डर यासह प्रशासकीय बाबी पूर्ण करणे अशी धावपळ सुरू आहे.

---

जिल्हा वार्षिक योजना : अर्थसंकल्पीय तरतूद : पुनर्विनियोजित तरतूद : प्रशासकीय मान्यता : वितरित तरतूद : एकूण खर्च : खर्चाची टक्केवारी

राज्यस्तर : १४७.६९ : १५५.६९ : १५८.७४ :१०८.७० : ७८.५१ : ५० ४३ टक्के

जिल्हा परिषदस्तर : १८२.३१ : १४७.०८ : ५८.४९ : ५५.६३ : ४८. ६६ : ३३. ०८ टक्के

कोरोना उपाययोजना : - : २७.२३ : २६.२५ : २५.३८ : २५.१२ : ९२. २५ टक्के

एकूण : ३३० : ३३० : २४३.४८ : १८९.८० : १५२.२९ : ४६. १५ टक्के

---------

जिल्हा परिषदेला २ वर्षांचा अवधी

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १३१ योजना येतात. राज्यस्तर आणि जिल्हा परिषद अशा दोन स्तरांवर हा निधी खर्चिला जातो. निधीला एकदा प्रशासकीय मान्यता घेऊन वर्कऑर्डर काढली की निधी परत शासनाकडे जात नाही. पुढे हे काम करुन निधी संपवण्यासाठी जिल्हा परिषदेला २ वर्षांचा कालावधी मिळतो.

---

पूर्वनियोजित विकासकामे आणि आराखडा असल्याने दिलेल्या मुदतीत सगळा निधी वापरू असा विश्वास आहे.

विजय पवार

जिल्हा नियोजन अधिकारी

-