शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१३९ गावे आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जिल्ह्यातील चित्र : साथींच्या रोगनियंत्रणासाठी यंत्रणा सतर्क

प्रकाश पाटील - कोपार्डेगेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की, जिल्ह्यातील गावात कावीळ, गॅस्ट्रो, तापाच्या साथीने लोकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ व अशा साथी आटोक्यात आणण्यासाठी लागणारे श्रम यांची जुळवाजुळव करताना दमछाक होते. यासाठी मागील काही वर्षांचे सर्वेक्षण करून पावसाळ्याच्या आगमनाबरोबर आरोग्य खात्याने कोल्हापूर जिल्ह्यातील १३९ गावे अतिधोक्याची घोषित केली असून, त्यांच्यावर करडी नजर ठेवली आहे. गत दोन वर्षांपूर्वी इचलकरंजी येथे आलेली काविळीची साथ व यात अनेक लोकांचा झालेला मृत्यू त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक गावांत गॅस्ट्रो, चिकनगुण्या, डेंग्यूमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी राज्याच्या आरोग्य सचिव सुजाता सौनिक यांनी अतिधोक्याच्या गावांवर विशेष लक्ष द्या, ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या गावांमध्ये पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा प्रचंड उद्रेक होतो, त्या गावांना अतिधोक्याची गावे म्हणून दरवर्षी घोषित केले जाते. अतिधोक्याची गावे विशेषत: नदीकाठची तसेच टीसीएल साठा कमी असणारी गावे आहेत. राज्यात २९ हजार ६०१ गावे आहेत. त्यापैकी तीन हजार ३९५ गावे ही अतिधोक्याची गावे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून या गावांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावांमधील पाण्याचा स्रोत तपासणे, इपिडेमिट कीट तैनात ठेवणे तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील तातडीचे वैद्यकीय पथक कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १३९ गावांमध्ये यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना राबविल्या जातात. त्यामुळे अतिधोक्याच्या गावांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वाधिक अतिधोक्याची गावे सातारा जिल्ह्यात आहेत. अकोला, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, ठाणे या जिल्ह्यांत सर्वाधिक अतिधोक्याची गावे आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. सातारा - २३७अकोला - २३६सिंधुदुर्ग - २३२अहमदनगर - २२३नांदेड - २००जालना - २०६भंडारा -१८२ठाणे - १७४सोलापूर - १७४सांगली - १७३लातूर - १६५गोंदिया - १४२कोल्हापूर - १३९चंद्रपूर - १२८पुणे - ११०