शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

हेल्मेट न वापरल्याने आठ महिन्यांत १२ जणांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:00 IST

मोहन सातपुते । लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग व अन्य राज्य महामार्गांवर हेल्मेट न वापरल्याने ...

मोहन सातपुते ।लोकमत न्यूज नेटवर्कउचगाव : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग व अन्य राज्य महामार्गांवर हेल्मेट न वापरल्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आठ महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न करता उघड्या डोक्यांनी दुचाकी चालवणाऱ्यांनी खबरदारी न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, तर कुटुंबही उद्ध्वस्त झाले आहे. महामार्गावर व अन्य राज्य महामार्गावर जीवघेण्या अपघातात मृत्युमुखी पडणाºयांच्या संसाराची वाताहत झाली आहे.चारचाकी वाहनचालक व मोटारसायकलवरून जाणाºया वाहनचालकांनी खबरदारी घेऊन वेळीच या जीवघेण्या महामार्गावरून मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा व चारचाकी चालविताना सीटबेल्टचा वापर केला आणि काळजी घेतली तर अपघातातून वाचण्याची शक्यता नाकारता येत नाही.अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणजे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग होय. या महामार्गावर फेब्रुवारी २०१८ पासून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जाणाºया वाहनचालकांचा हेल्मेट न वापरल्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने उजळाईवाडी एक, तावडे हॉटेल एक, शिरोली तीन, अंबप फाटा एक, कागल एक, वाकरे फाटा तीन, अन्य ठिकाणी एक असे बाराजणांवर हेल्मेट न वापरल्याने अपघातात काळाने झडप घातली. त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मोठा आघात सहन करावा लागत आहे.चारचाकी वाहनचालकांकडून हलगर्जीपणाने सीटबेल्ट न वापरल्यामुळे मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन हजार चारचाकी वाहनधारकांकडून चार लाख रुपयांचा (महसूल स्वरूपात) दंड जमा झाला आहे, तर दुचाकीधारकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३८ दुचाकीधारकांकडून एकोणीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही अपघाताला धोकादायक ठरू शकेल असे वर्तन करत वाहन चालवीत आहेत. वाहनधारकांची मानसिकता बदलणे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे काम उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने सुरू आहे.