शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:45 IST

हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देजादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक‘कागल’ तालुक्यातील संस्था : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडविरोधात तक्रार

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड ही कंपनी २०११ साली राजारामपुरी व हमीदवाडा येथे सुरू झाली. ५०० हून अधिक एजंटांमार्फत सर्वसामान्यांना शेळीपालन, दुग्ध तसेच अन्य व्यवसाय उभे करून, आर्थिक फायदा व रोजगाराचे आमिष दाखवून तिने गुंतवणूक करायला भाग पाडले. पुनरावर्ती ठेव, मुदतबंद ठेव अशा विविध योजनांतून १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत १५ हजार नागरिकांनी यात गुंतवणूक केली. केवळ कोल्हापुरातून सात हजार नागरिकांनी पाच कोटींच्या आसपास या कंपनीत गुंतवणूक केली आहे.गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली. पैसे व्याजासह परत करण्याची वेळ आली तेव्हा टाळाटाळ सुरू झाली. एजंटांना दिलेले धनादेश वटले नाहीत. कंपनीचे कार्यालय आणि संचालकांचे फोनही बंद आहेत. दाद मागण्यासाठी घरावर मोर्चा नेला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी बंगलोर येथील न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र या आदेशालाही दाद देण्यात आलेली नाही.

त्यामुळे कंपनीची चौकशी व्हावी, अध्यक्ष बंडोपंत पाटील (म्हाकवेकर), म्होरके संचालकांची तसेच सदस्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताराराणी महिला आघाडीने केली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्षा श्रद्धा महागांवकर, अश्विनी खोत, सूर्यकांत डवरी, नंदकुमार डवरी, सुवर्णा शिंदे, दीपाली मंडले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

बंडोपंत पाटील हे बाजार समितीचे दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर गोकुळ व बिद्री कारखान्याचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले. सुरुवातीला ते बालाजी ड्रॉ काढत होते. त्यामाध्यमातून लोकांना बक्षीसे द्यायचे. त्यातून विश्र्वास निर्माण झाल्यावर कृषीबंध संस्था स्थापण करून त्यांनी पैसे गोळा केले व ही गुंतवणूक प्लॉटमध्ये करणार असून तुम्हांला चारदोन वर्षात लगेच पैसे परत करणार असे आश्वासन ते त्यावेळी देत होते. त्यास भुलून लोकांनी गुंतवणूक केली व आता ती बुडाल्यावर आमची फसवणूक झाली म्हणून त्यांच्या घरावर मोर्चे काढू लागले आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWomenमहिलाkolhapurकोल्हापूर