शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:45 IST

हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देजादा व्याजाच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक‘कागल’ तालुक्यातील संस्था : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडविरोधात तक्रार

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. दीड वर्षापासून मात्र कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरुवात केली आणि आता गाशा गुंडाळल्याने अध्यक्ष बंडोपंत कुंडलिक पाटील (म्हाकवेकर) यांच्यासह संचालकांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ताराराणी महिला आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड ही कंपनी २०११ साली राजारामपुरी व हमीदवाडा येथे सुरू झाली. ५०० हून अधिक एजंटांमार्फत सर्वसामान्यांना शेळीपालन, दुग्ध तसेच अन्य व्यवसाय उभे करून, आर्थिक फायदा व रोजगाराचे आमिष दाखवून तिने गुंतवणूक करायला भाग पाडले. पुनरावर्ती ठेव, मुदतबंद ठेव अशा विविध योजनांतून १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत १५ हजार नागरिकांनी यात गुंतवणूक केली. केवळ कोल्हापुरातून सात हजार नागरिकांनी पाच कोटींच्या आसपास या कंपनीत गुंतवणूक केली आहे.गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली. पैसे व्याजासह परत करण्याची वेळ आली तेव्हा टाळाटाळ सुरू झाली. एजंटांना दिलेले धनादेश वटले नाहीत. कंपनीचे कार्यालय आणि संचालकांचे फोनही बंद आहेत. दाद मागण्यासाठी घरावर मोर्चा नेला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी बंगलोर येथील न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र या आदेशालाही दाद देण्यात आलेली नाही.

त्यामुळे कंपनीची चौकशी व्हावी, अध्यक्ष बंडोपंत पाटील (म्हाकवेकर), म्होरके संचालकांची तसेच सदस्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताराराणी महिला आघाडीने केली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्षा श्रद्धा महागांवकर, अश्विनी खोत, सूर्यकांत डवरी, नंदकुमार डवरी, सुवर्णा शिंदे, दीपाली मंडले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

बंडोपंत पाटील हे बाजार समितीचे दहा वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर गोकुळ व बिद्री कारखान्याचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले. सुरुवातीला ते बालाजी ड्रॉ काढत होते. त्यामाध्यमातून लोकांना बक्षीसे द्यायचे. त्यातून विश्र्वास निर्माण झाल्यावर कृषीबंध संस्था स्थापण करून त्यांनी पैसे गोळा केले व ही गुंतवणूक प्लॉटमध्ये करणार असून तुम्हांला चारदोन वर्षात लगेच पैसे परत करणार असे आश्वासन ते त्यावेळी देत होते. त्यास भुलून लोकांनी गुंतवणूक केली व आता ती बुडाल्यावर आमची फसवणूक झाली म्हणून त्यांच्या घरावर मोर्चे काढू लागले आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीWomenमहिलाkolhapurकोल्हापूर