शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

बाळेवाडीत पेयजलमध्ये १.१३ कोटीचा भ्रष्टाचार : चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:00 IST

सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब

ठळक मुद्देजि. प. जलव्यवस्थापन समिती न झालेल्या कामाची बिले काढली

सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब गुरुवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत उघड झाली. समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते. सभेत बाळेवाडीचे प्रकरण गाजले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून याठिकाणी काम मंजूर झाले होते. योजनेचे काम न करताच बिले निघाल्याची बाब समोर आली. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचा हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील महिन्यात पंचायतराज समितीने पाणी योजनांच्या कामावरुन अधिकाऱ्याना धारेवर धरले होते. त्यातच पाणी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणाची भर पडली. बाळेवाडीतील पाणी योजनेच्या कामाची चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्याची मागणी सदस्यांनी केली. यासाठी निधीची कमतरता असेल, तर रोटेशन पद्धतीने तालुक्यांची कामे मंजूर करावीत, अशी मागणी केली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामे, चौदावा वित्त आयोग आणि सर्व शासकीय योजनांची कार्यालयाच्या माहितीसाठी प्रभाग समितीची बैठक सदस्यांनी घ्यावी, अपूर्ण कामे मार्गी लावावीत, मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे वेळेवर करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना दिल्या आहेतजतमधील मनरेगा कामांचीही चौकशीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जत तालुक्यातील सहा गावांमध्ये झालेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कामांचीही चौकशी करण्यात यावी, असे आदेश देशमुख यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तातडीने अहवाल सादर करून कोणी अधिकारी, कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.