शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

बाळेवाडीत पेयजलमध्ये १.१३ कोटीचा भ्रष्टाचार : चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:00 IST

सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब

ठळक मुद्देजि. प. जलव्यवस्थापन समिती न झालेल्या कामाची बिले काढली

सांगली : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या न झालेल्या कामाची बिले काढून आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे १ कोटी १३ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब गुरुवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत उघड झाली. समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते. सभेत बाळेवाडीचे प्रकरण गाजले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून याठिकाणी काम मंजूर झाले होते. योजनेचे काम न करताच बिले निघाल्याची बाब समोर आली. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचा हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील महिन्यात पंचायतराज समितीने पाणी योजनांच्या कामावरुन अधिकाऱ्याना धारेवर धरले होते. त्यातच पाणी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणाची भर पडली. बाळेवाडीतील पाणी योजनेच्या कामाची चौकशी करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्याची मागणी सदस्यांनी केली. यासाठी निधीची कमतरता असेल, तर रोटेशन पद्धतीने तालुक्यांची कामे मंजूर करावीत, अशी मागणी केली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामे, चौदावा वित्त आयोग आणि सर्व शासकीय योजनांची कार्यालयाच्या माहितीसाठी प्रभाग समितीची बैठक सदस्यांनी घ्यावी, अपूर्ण कामे मार्गी लावावीत, मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे वेळेवर करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना दिल्या आहेतजतमधील मनरेगा कामांचीही चौकशीमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जत तालुक्यातील सहा गावांमध्ये झालेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कामांचीही चौकशी करण्यात यावी, असे आदेश देशमुख यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तातडीने अहवाल सादर करून कोणी अधिकारी, कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.