शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

शासनाकडून १००० रुपयांचे मुद्रांक गायब

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

ई-चलनाद्वारे होणार विक्री-एक हजार व त्यावरील किमतीचे मुद्रांक विक्री करण्यास शासनाची बंदी मुद्रांक विक्रेते अडचणीत

संदीप बावचे - शिरोळ -मुद्रांक विक्रेत्यांना एक हजार रुपये व त्यावरील किमतीच्या मुद्रांक विक्रीस शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांना प्राप्त झाले असून, आता मुद्रांक विक्रेत्यांकडे केवळ शंभर व पाचशे रुपये किमतीचेच मुद्रांक उपलब्ध होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मुद्रांक विक्रेत्याला कमाल तीस हजार रुपये किमतीचे मुद्रांक विक्री करण्याची मुभा होती. विक्रीच्या किमतीवर त्यांना तीन टक्के कमिशन मिळत होते. आता केवळ शंभर व पाचशे रुपये किमतीचेच मुद्रांक विक्रेत्यास विकावे लागणार आहेत. यामुळे यापुढे मुद्रांक विक्रीचा व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. छापील मुद्रांकाऐवजी शासनाने अलीकडच्या काळात ई-चलनाद्वारेदेखील मुद्रांक उपलब्ध केला आहे. त्यामुळे संबंधित पक्षकारास मुद्रांक खरेदी करणे सोपे व सुटसुटीत झाले आहे. तसेच दस्तऐवजाच्या नोंदणी प्रक्रियेतसुद्धा सुलभता आली आहे. महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग प्रधान मुद्रांक कार्यालय मुंबई या विभागाकडून जिल्हा कोषागार कार्यालयाला नुकतेच परिपत्रक प्राप्त झाले आहे. एक हजार रुपये व त्यावरील किमतीच्या मुद्रांकाची विक्री पूर्णत: बंद करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय अशा मुद्रांकाची छपाईदेखील बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अप्पर मुद्रांक नियंत्रण यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांना हे परिपत्रक प्राप्त झाले आहे. २७ जानेवारी २०१५ पासून उपकोषागार कार्यालयातून अशी मुद्रांक विक्री बंद करण्यात आल्यामुळे मुद्रांक विक्रेत्याला एक हजार रुपये व त्यावरील किमतीचे मुद्रांक मिळणे बंद झाले आहे. शिवाय संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनही मुद्रांक विक्रेत्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे मुद्रांक विक्री व्यवसायावर मोठे गंडांतर येणार आहे.मुद्रांक व्यवस्था यापुढे चालू ठेवायची की बंद करायची अशा विवंचनेत विक्रेता सापडला आहे. राज्यातील मुद्रांक विक्रेत्यासंदर्भात शासन काय धोरण ठेवणार हे गुलदस्त्यात असून, धोरणाकडे मुद्रांक विक्रेते प्रतीक्षेत आहेत.शंभर रुपयांचे ८० टक्केमुद्रांक हे प्रतिज्ञापत्रासाठीच वापरले जात होते, तर उर्वरित २० टक्के मुद्रांक ऊस नोंदणी करार, बॅँक कर्ज प्रकरण करण्यासाठी लागत होते. शैक्षणिक, न्यायालयीन, शासकीय कामासाठी प्रतिज्ञापत्रे शासनाने कोऱ्या कागदावर करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे शंभर रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता जादा प्रमाणात भासणार नसल्यामुळे शंभर रुपयांचा मुद्रांक कोणाला विकायचा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र, संबंधित शासकीय कार्यालये कोऱ्या कागदावरील प्रतिज्ञापत्राची कितपत अंमलबजावणी करतात व शासनाने दिलेली सवलत पक्षकारांसाठी कितपत यशस्वी ठरणार हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.