शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

‘सारथी’चा १००० कोटींचा निधी लवकर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेले एक हजार कोटींचा निधी ‘सारथी’साठी लवकरात लवकर द्यावा, अशी विनंतीवजा सूचना खासदार संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी केली.

आमच्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्ही एक महिन्याची मुदत दिली होती. ती संपण्याआधी सरकारने यात लक्ष घालावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो एक हजार कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. परंतु तो कसा देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा किती देणार जाहीर करावे, असे संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमचे मूक आंदोलन संपलेले नाही याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

‘सारथी’ची बोर्ड मिटिंग अद्याप झालेली नाही. दि. १४ जुलै रोजी ती होत आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगून संभाजीराजे यांनी सांगितले की, सारथीचे कोल्हापुरात उपकेंद्र सुरू झाले तसेच ते नाशिक, संभाजीनगर, नांदेड येथेही होणार आहे. जागा तयार आहेत. त्यामुळे ही केंद्रेही लवकर सुरू व्हावीत, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरचे केंद्र सारथीचे मुख्य केंद्र झाले तर स्वागतच आहे.

सारथीचे पुनर्रस्थापना, त्याची स्वायत्तता आणि त्याची उपकेंद्रे या मागण्या मान्य झाल्या आहेत. राहिला प्रश्न तो निधीचा. अजित पवार यांनी लवकरच जाहीर करावा. त्यामुळे कामे सुरू होतील. निधीबाबत जरुर पडली तर मी स्वत: अजित पवार यांच्याशी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठ्यांना सामाजिक मागास असल्याचे सिध्द झाले तरच आरक्षण मिळणार आहे. पण आजच्या घडीला मराठा समाज उच्च, प्रगत असल्याने आरक्षण मिळू शकणार नाही. म्हणूनच मी दोन पर्याय सुचविले आहेत. ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याबरोबरच राज्यपालांमार्फत ३४२ अ प्रमाणे केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे हेच पर्याय आहेत. दोन्ही गोष्टी समांतर पध्दतीने सुरू ठेवल्या पाहिजेत, असे संभाजीराजेंनी सांगितले.

सारखी तलवार कशाला उगारायची?

मागण्याबाबत विलंब झाला तर आंदाेलन तीव्र करणार का? असे विचारता संभाजीराजे म्हणाले, केव्हा आवाज टाकायचा, दबाव टाकायचा मला कळतंय. ज्या छत्रपती घराण्यात जन्मलो म्हणून सारखी तलवार उगारायची काय गरज आहे? सामंजस्याने बोलून कामा होत आहे. प्रश्न संवादातून सुटत आहेत. एक महिन्याची मुदत दिली असली तर आणखी काही दिवस थांबलो तर काहीच फरक पडणार नाही.