शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
3
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
6
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
7
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
10
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
11
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
12
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
13
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
14
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
15
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
16
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
17
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
18
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
19
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’चा १००० कोटींचा निधी लवकर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेले एक हजार कोटींचा निधी ‘सारथी’साठी लवकरात लवकर द्यावा, अशी विनंतीवजा सूचना खासदार संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी केली.

आमच्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्ही एक महिन्याची मुदत दिली होती. ती संपण्याआधी सरकारने यात लक्ष घालावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो एक हजार कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. परंतु तो कसा देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा किती देणार जाहीर करावे, असे संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमचे मूक आंदोलन संपलेले नाही याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

‘सारथी’ची बोर्ड मिटिंग अद्याप झालेली नाही. दि. १४ जुलै रोजी ती होत आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगून संभाजीराजे यांनी सांगितले की, सारथीचे कोल्हापुरात उपकेंद्र सुरू झाले तसेच ते नाशिक, संभाजीनगर, नांदेड येथेही होणार आहे. जागा तयार आहेत. त्यामुळे ही केंद्रेही लवकर सुरू व्हावीत, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरचे केंद्र सारथीचे मुख्य केंद्र झाले तर स्वागतच आहे.

सारथीचे पुनर्रस्थापना, त्याची स्वायत्तता आणि त्याची उपकेंद्रे या मागण्या मान्य झाल्या आहेत. राहिला प्रश्न तो निधीचा. अजित पवार यांनी लवकरच जाहीर करावा. त्यामुळे कामे सुरू होतील. निधीबाबत जरुर पडली तर मी स्वत: अजित पवार यांच्याशी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठ्यांना सामाजिक मागास असल्याचे सिध्द झाले तरच आरक्षण मिळणार आहे. पण आजच्या घडीला मराठा समाज उच्च, प्रगत असल्याने आरक्षण मिळू शकणार नाही. म्हणूनच मी दोन पर्याय सुचविले आहेत. ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याबरोबरच राज्यपालांमार्फत ३४२ अ प्रमाणे केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे हेच पर्याय आहेत. दोन्ही गोष्टी समांतर पध्दतीने सुरू ठेवल्या पाहिजेत, असे संभाजीराजेंनी सांगितले.

सारखी तलवार कशाला उगारायची?

मागण्याबाबत विलंब झाला तर आंदाेलन तीव्र करणार का? असे विचारता संभाजीराजे म्हणाले, केव्हा आवाज टाकायचा, दबाव टाकायचा मला कळतंय. ज्या छत्रपती घराण्यात जन्मलो म्हणून सारखी तलवार उगारायची काय गरज आहे? सामंजस्याने बोलून कामा होत आहे. प्रश्न संवादातून सुटत आहेत. एक महिन्याची मुदत दिली असली तर आणखी काही दिवस थांबलो तर काहीच फरक पडणार नाही.