शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

प्रदूषणाने रंकाळ्यात १०० वर्षांचे कासव मृत : दुर्मीळ इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:57 IST

आदित्य वेल्हाळ।कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. जंगली वाघाइतकेच संरक्षित असणारे हे मऊ पाठीचे गोड्या पाण्यातील कासव सोमवारी रंकाळ्यात मृतावस्थेत आढळून ...

ठळक मुद्देवाघाइतकेच संरक्षित असणारे; मऊ पाठ हे वैशिष्ट्य

आदित्य वेल्हाळ।कोल्हापूर : रंकाळ्यात राहणारा व तलावाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेला इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल (मऊ पाठीचा कासव) हा रंकाळ्यातील प्रदूषणाचा बळी ठरला. त्याचे वजन सुमारे ९० किलो होते. त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. जंगली वाघाइतकेच संरक्षित असणारे हे मऊ पाठीचे गोड्या पाण्यातील कासव सोमवारी रंकाळ्यात मृतावस्थेत आढळून आले.

सोमवारी दुपारी रंकाळा तलावात पद्माराजे उद्यानासमोर दोन तरुणांना कासव तरंगताना दिसले. याबाबतची माहिती तरुणांनी ‘लोकमत’ला दिली. या कासवाला रंकाळा बचाव समितीचे शाहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी पाण्यातून बाहेर काढले. त्याची लांबी साडेचार फूट होती व त्याच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. ते प्रदूषित पाण्यामुळे मृत झाले आहे, अशी शक्यता यावेळी पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

कासवासारखा उभयचर प्राणी मृत होत असेल, तर रंकाळा तलावातील जैवविविधता संपत आल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे काही दिवसांत जैवविविधतेत मृत पाण्याचा साठा म्हणून रंकाळा तलावाला घोषित करावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूरची ओळख असणारा रंकाळा तलाव हा पूर्वीपासूनच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. चित्रपटांतून, चित्रकारांच्या कुंचल्यातून त्याची नैसर्गिक विविधता जितकी आकर्षित करते, त्याहूनही जैवविविधतेने तो समृद्ध आहे. स्थलांतरित पक्षी, उदमांजर, कीटक, सरपटणारे प्राणी, मासे या सर्वांसाठी आश्रयस्थान हा तलाव आहे.; पण गेल्या काही वर्षांत या तलावाचे प्रदूषण होत आहे. त्याची किंमत रंकाळ्यातील जलचरांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना मोजावी लागत आहे. 

इंडियन सॉफ्टशेल्ड टरटल कासव वाघाइतकेच संरक्षित आहे. या जातीची अनेक कासव या तलावात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलाव संरक्षित घोषित करावा.- प्रा. डॉ. जय सामंत, पर्यावरण तज्ज्ञ