शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

कसबा वाळवे येथे १०० रुग्ण, बँकासह सर्व व्यवहार १० दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. ...

तुरंबे : राधानगरी तालुक्यात ५५० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. १९ गावांत रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये येण्या-जाण्यास पूर्ण मज्जाव करण्याची आवश्यकता आहे.

तालुक्‍यातील ४० गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता कमिटी यांनी कडक अंमलबजावणी करण्याची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे.

तिटवे येथे दोन रुग्ण दगावल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील रुग्णवाढ असणाऱ्या गावांना प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी कडक पाऊल उचलत १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. कसबा वाळवे गावात तब्बल १०० रुग्ण आहेत. त्यामुळे या गावातील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या बँक, किराणा दुकान बंद आहेत. स्थानिक प्रशासनस्तरावर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता घेण्याची सूचना प्रांत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मोठी गावे चिडीचूप आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अखंड तालुक्यात लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे.

पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ४० गावांमधील आढळलेले रुग्ण असे - कसबा वाळवे १००, राशिवडे ४१, धामोड २७, पालकरवाडी २४, राधानगरी २०, कसबा तारळे १८, गुडाळ, सोळांकूर, आवळी बुद्रूक तिटवे, सरवडे प्रत्येकी १४, तारळे खुर्द १३, ठिकपुर्ली १२, घोटवडे, तळगाव, पुंगाव, शिरगाव प्रत्येकी ११, कासारपुतळे तुरंबे प्रत्येकी १०, सोन्याची शिरोली, नऊ कोते, नरतवडे प्रत्येकी ८, आमजाई, व्हरवडे कोदवडे, माजगाव प्रत्येकी ७, चंद्रे, तरसंबळे, मजरे, कासारवाडा, मांगेवाडी, मुसळवाडी, शेळेवाडी प्रत्येकी ६, कुंभारवाडी, चक्रेश्वरवाडी, बनाचीवाडी, बारडवाडी, येळवडे, मोघर्डे प्रत्येकी ५, अर्जुनवाडा १, चांदेकरवाडी ३, कपिलेश्वर ३, मांगोली २, आकनूर १, खिंडीव्हरवडे २, सिरसे १, आणाजे.

कोट

बाजारपेठ असणाऱ्या मोठ्या गावात अधिक संपर्क येत असल्याने रुग्णवाढ

राधानगरी तालुक्यातील राशिवडे, धामोड, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकूर आदी गावांमध्ये बाजार भरतो. बाजार बीट असणारे गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर छोट्या-मोठ्या गावातील लोकांचा नित्य संपर्कामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.- डॉ. राजेंद्रकुमार शेट्ये, राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी