शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सार्वजनिक क्षेत्रात खासगी गुंतवणुकीचा प्रकल्प साकारणार, कोल्हापुरात १०० ई बसेस धावणार

By भारत चव्हाण | Updated: April 4, 2025 18:06 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : शहरी तसेच निमशहरी भागातील प्रवासी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या हेतूने ...

भारत चव्हाणकोल्हापूर : शहरी तसेच निमशहरी भागातील प्रवासी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारने राज्यातील २१ शहरांना ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरला वातानुकूलित १०० ई बसेस मिळणार असून, त्या लवकरच ‘केएमटी’च्या ताफ्यात येत आहेत. या बसेसमुळे प्रवासी सेवेचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहरी भागात उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुमार दर्जाची, बेभरवशाची आणि बसेस मिळतीलच याची शाश्वती नसल्यासारखी आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ती मोडकळीस आली आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून ही व्यवस्था सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे.केंद्र सरकारतर्फे देशभरातील १६९ शहरांत, तर महाराष्ट्रात २१ शहरांत वातानुकूलित ई-बसेस दिल्या जात आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहराचाही समावेश आहे. कोल्हापूरला ‘केएमटी’कडे शंभर ई-बसेस मिळणार आहेत. त्यातून कोल्हापूरकरांना आल्हाददायक प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्याची तयारी ‘केएमटी’ प्रशासनाकडून जोरात सुरू आहे.

कशा उपलब्ध होणार ई-बसेस?

  • केंद्र सरकार ठेकेदारामार्फत देणार १०० ई-बसेस
  • बसेस खरेदीची संपूर्ण राज्यासाठी एकच निविदा मंजूर.
  • जेबीएम इकोलाइफ कंपनीला बस पुरवठ्याचा ठेका
  • कंपनी २१ शहरांना टप्प्याटप्प्याने बस देणार

ठेकेदार कंपनीला किती पैसे देणार?

  • ठेकेदार कंपनी १२ मीटर व नऊ मीटर लांबीची प्रत्येकी ५० बस देणार
  • १२ मीटरच्या बसला प्रति कि.मी. ६९ रुपये, तर ९ मीटर बसला प्रति कि.मी. ६३ रुपये भाडे
  • या भाड्यापैकी प्रति कि.मी.साठी केंद्र सरकार २४ रुपये सबसिडी देणार.
  • राज्य सरकारनेही काही सबसिडी द्यायची आहे, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
  • केंद्र व राज्य सरकारच्या सबसिडीनंतरही काही फरक राहत असेल तर तो ‘केएमटी’ने द्यायचा आहे.

कर्मचारी कोणाचे, पगार कोण देणार?

  • चालक, नियंत्रक, तसेच देखभाल-दुरुस्तीसाठीचे कर्मचारी ठेकेदाराचे असतील
  • वाहक, सुपरवायझर, व्यवस्थान कर्मचारी केएमटीचे असतील
  • ‘केएमटी’कडील काही कर्मचारी ठेकेदाराकडे वर्ग होतील
  • केएमटी व ठेकेदार यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत

प्रवासी तिकिटाचे दर कोण ठरविणार?

  • बसच्या तिकिटाचे दर ठरविण्यासाठी राज्य सरकारची समिती असेल
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पोलिस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील
  • ही समिती ठरवील तेच दर लागू होणार, परस्पर ठेकेदारास दर ठरविण्याचा अधिकार नाही

करार किती वर्षांचा असेल?केएमटी व जेबीएम कंपनीत १० अधिक दोन अशा बारा वर्षांचा करार होईल. एकदा करार झाल्यानंतर बारा वर्षे बससेवा ठेकेदाराने द्यायची आहे.

ठेकेदारास केएमटी काय देणार?ठेकेदारासाठी सुसज्ज डेपो तसेच ई-बसेस चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन केएमटी देणार आहे; परंतु केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून १६ कोटींचा सुसज्ज डेपो तर १७ कोटींचे चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर