शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सार्वजनिक क्षेत्रात खासगी गुंतवणुकीचा प्रकल्प साकारणार, कोल्हापुरात १०० ई बसेस धावणार

By भारत चव्हाण | Updated: April 4, 2025 18:06 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : शहरी तसेच निमशहरी भागातील प्रवासी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या हेतूने ...

भारत चव्हाणकोल्हापूर : शहरी तसेच निमशहरी भागातील प्रवासी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारने राज्यातील २१ शहरांना ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरला वातानुकूलित १०० ई बसेस मिळणार असून, त्या लवकरच ‘केएमटी’च्या ताफ्यात येत आहेत. या बसेसमुळे प्रवासी सेवेचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहरी भागात उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुमार दर्जाची, बेभरवशाची आणि बसेस मिळतीलच याची शाश्वती नसल्यासारखी आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ती मोडकळीस आली आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून ही व्यवस्था सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे.केंद्र सरकारतर्फे देशभरातील १६९ शहरांत, तर महाराष्ट्रात २१ शहरांत वातानुकूलित ई-बसेस दिल्या जात आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहराचाही समावेश आहे. कोल्हापूरला ‘केएमटी’कडे शंभर ई-बसेस मिळणार आहेत. त्यातून कोल्हापूरकरांना आल्हाददायक प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. त्याची तयारी ‘केएमटी’ प्रशासनाकडून जोरात सुरू आहे.

कशा उपलब्ध होणार ई-बसेस?

  • केंद्र सरकार ठेकेदारामार्फत देणार १०० ई-बसेस
  • बसेस खरेदीची संपूर्ण राज्यासाठी एकच निविदा मंजूर.
  • जेबीएम इकोलाइफ कंपनीला बस पुरवठ्याचा ठेका
  • कंपनी २१ शहरांना टप्प्याटप्प्याने बस देणार

ठेकेदार कंपनीला किती पैसे देणार?

  • ठेकेदार कंपनी १२ मीटर व नऊ मीटर लांबीची प्रत्येकी ५० बस देणार
  • १२ मीटरच्या बसला प्रति कि.मी. ६९ रुपये, तर ९ मीटर बसला प्रति कि.मी. ६३ रुपये भाडे
  • या भाड्यापैकी प्रति कि.मी.साठी केंद्र सरकार २४ रुपये सबसिडी देणार.
  • राज्य सरकारनेही काही सबसिडी द्यायची आहे, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
  • केंद्र व राज्य सरकारच्या सबसिडीनंतरही काही फरक राहत असेल तर तो ‘केएमटी’ने द्यायचा आहे.

कर्मचारी कोणाचे, पगार कोण देणार?

  • चालक, नियंत्रक, तसेच देखभाल-दुरुस्तीसाठीचे कर्मचारी ठेकेदाराचे असतील
  • वाहक, सुपरवायझर, व्यवस्थान कर्मचारी केएमटीचे असतील
  • ‘केएमटी’कडील काही कर्मचारी ठेकेदाराकडे वर्ग होतील
  • केएमटी व ठेकेदार यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत

प्रवासी तिकिटाचे दर कोण ठरविणार?

  • बसच्या तिकिटाचे दर ठरविण्यासाठी राज्य सरकारची समिती असेल
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पोलिस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील
  • ही समिती ठरवील तेच दर लागू होणार, परस्पर ठेकेदारास दर ठरविण्याचा अधिकार नाही

करार किती वर्षांचा असेल?केएमटी व जेबीएम कंपनीत १० अधिक दोन अशा बारा वर्षांचा करार होईल. एकदा करार झाल्यानंतर बारा वर्षे बससेवा ठेकेदाराने द्यायची आहे.

ठेकेदारास केएमटी काय देणार?ठेकेदारासाठी सुसज्ज डेपो तसेच ई-बसेस चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन केएमटी देणार आहे; परंतु केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून १६ कोटींचा सुसज्ज डेपो तर १७ कोटींचे चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर