शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्यांसाठी 'ते' ठरले देवदूत; शहर पाण्यात असताना भूकेनं व्याकूळ चिमुकल्यांपर्यंत पोहोचवलं दूध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 00:16 IST

कल्याणच्या तरुणांचं होतंय कौतुक; कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत चिमुकल्यांपर्यंत पोहोचवलं दूध

- मयुरी चव्हाण

कल्याण: संकट कोणतंही असो... कोणत्याही यंत्रणांच्या अखत्यारितलं असो... सर्वात आधी धावून जाते ती माणुसकीची यंत्रणा... अर्थात असं नेहमी बोललं जातं की चांगली माणस आहेत म्हणूनच  माणुसकी अजून जिवंत आहे.. याचाच प्रत्यय आज कल्याणमध्ये आला.. कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. मदतकार्य सुरू होतं आणि या सर्व कठीण परिस्थितीत कल्याणमधील खरे कुटुंब दुधाच्या शोधात होतं. घरातील दोन चिमुकल्या बाळांना भूक लागली होती. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना आईच दूधही द्यायचं नव्हतं. त्यामुळे खरे कुटुंबियांची दुधासाठी शोधाशोध सुरू झाली. बाहेर पाणी आणि घरात चिमुकल्यांच्या भुकेची काळजी. जवळची दुकान बंद होती. दूध न मिळाल्यानं  चिमुकली रडू लागली. त्यांच्या रडण्याचा आवाज कल्याणमधील युवकांच्या कानी पडला आणि क्षणाचाही विलंब न करता ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोणतंही वाहन उपलब्ध होत नसताना, कमरेभर पाण्यातून वाट काढत ते दूध घेऊन खरे कुटुंबियापर्यंत पोहचले आणि अखेर चिमुकल्याचा आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातील साई धाम सोसायटीत राहणाऱ्या खरे कुटुंब राहते. गुरुवारी या परिसरात सुद्धा पाणी साचले होते. घरातील दोन चिमुकल्याना भूक लागली होती. देवांश आणि सारांश हे दोघेही जुळे भाऊ असून नुकतच त्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांची आई  ईशा खरे यांना एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता. त्यामुळे तुर्तास आईचे दूध न पाजण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तसेच मुलांचा काहीसा लवकर जन्म झाला असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. गुरुवारी दोघांनाही भूक लागली. घरातील सर्व दूध संपलं. बाहेर पुरजन्य परिस्थिती. त्यात भुकेनं चिमुकल्यांचं रडणं ऐकून आजी आजोबांचा जीवही कासावीस झाला. घरात दुसरं कोणी नाही. वडील गौरव खरे हे सुद्धा पाण्यामुळे बाहेर अडकून बसले होते. अशातच बाळांची आत्या संगीता खरे  यांनी कल्याणातील युवक महेश बनकर या तरुणाला मदतीसाठी फोन केला. क्षणाचाही विलंब न लावता दूध घेऊन आधारवाडीहुन शहाडच्या दिशेने निघाले. बिर्ला कॉलेजपासून पुढे पाणी साचल्यानं पायीच वेगवेगळे रस्ते शोधत, पाण्यातून वाट काढत महेश आणि  त्याचे मित्र साई धाम सोसायटीत पोहचले आणि दूध बाळांच्या आजोबांकडे सुपूर्द केले. या कठीण परिस्थितीत जीवाची बाजी लावून केवळ दोन लहानग्यांसाठी तरुणांनी केलेली मदत पाहून ते भारावून गेले. महेश आणि त्याच्या मित्रांनी दाखविलेल्या या माणूसकीचे  कौतुक होत असून असे तरुण इतर तरूणांसाठीही आदर्श ठरत आहेत.