शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मुंब्र्यात रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

By अनिकेत घमंडी | Updated: April 23, 2024 21:07 IST

ते मुंबई येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. 

डोंबिवली: मुंब्रा येथील रेतीबंदर भागात उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. प्रसाद करीया मुलिया (३८) असे मृताचे नाव असून याप्रकरणाची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पातील रेतीबंदर रेल्वेपूलावरून प्रवासी खालील रस्त्यावर पडला. गर्दीमुळे हा अपघात झाला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. असे असले तरी प्रवासी संघटनांकडून या अपघाताबाबत रेल्वे प्रशासनावर टीका करत आहे. ठाकूर्ली येथे प्रसाद मुलिया हे वास्तव्यास होते. ते मुंबई येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. 

सोमवारी त्यांची कंपनीमध्ये रात्र-पाळी होती. त्यामुळे ते रात्री मुंबईत कामानिमित्ताने जात होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी येथील रेतीबंदर रेल्वे पूलावर आली. त्यावेळी ते रेल्वेगाडीतून थेट पूलाखालील रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. घटनेची माहिती मुंब्रा रेल्वे पोलीस आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ओळख पटावी यासाठी पथकाने त्यांच्या शर्टचे खिसे तपासले. त्यावेळी त्या तरुणाकडे मोबाईल व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. पथकाने त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंरतु दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली