शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 14:09 IST

Kalyan : कपिल पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांची पाहणी आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरु असल्याची बाब केंद्रीय मंत्री पाटील यांनी नमूद केली आहे. 

मागच्या महिन्यात पार पडलेल्या दिशा कमिटीच्या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पांचा विषय मांडण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाविषयी विचारणा करीत ही कामे जलगगतीने व्हावी असा मुद्या उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाकडून कोविडमुळे प्रकल्पांना विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी सुरु असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

त्यानुसार आज पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी पश्चात  पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शंभर शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापलिकेची निवड करण्यात आली. 

या स्मार्ट सिटी प्रकल्पांकरीता केंद्र, राज्य आणि महापालिकेचा निधी खर्च होत आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरु असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखीत करीत प्रकल्पांच्य कामांना गती द्या. नागरिकांच्या हिताची कामे जी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये नव्हती. त्यांचाही समावेश करण्यात यावा अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनास केली आहे. काळा तलावाचे नाव भगवा तलाव झालेले नसून अद्याप काळा तलावच आहे असे विधान करीत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

जितेंद्र आव्हाड यांची टीका ओबीसी समाजाचा अपमान करणारी - पाटीलजितेंद्र आव्हाड हे फार उच्च कोटीचे नेते आहे. ओबीसीवर भरोसा नही. ते कशासाठी भरोसा नाही हे मला माहिती नाही. ज्या मतदार संघातून ते निवडून येतात. त्याठिकाणचे ओबीसी त्यांना मदत करीत असली. त्यांना नेमके काय म्हणायचे होते हे माहिती नाही. त्यांचे वक्तव्य हे ओबीसी समाजाचा अपमान करणारे आहे. स्वत:ला सेक्यूलर समजणारे लोकं जेव्हा एका जातीच्या घटकाबद्दल वक्तव्य करतात. तेव्हा ते वक्तव्य निश्चितपणे निषेधार्थ आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली