शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कल्याणला रुग्णालयाच्या दारातच महिलेचा मृत्यू; रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:28 IST

खडेगोळवली परिसरातील सविता या उल्हासनगरमधील एका कंपनीत शिलाईचे काम करतात.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका महिलेला उपचारासाठी आणले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला डॉक्टरांनी कळवा सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तिचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सविता गोविंद बिराजदर (४३) असे आहे. 

खडेगोळवली परिसरातील सविता या उल्हासनगरमधील एका कंपनीत शिलाईचे काम करतात. त्यांना एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. सविता यांची प्रकृती सोमवारी बिघडल्याने घरच्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात दुपारी एक वाजता तिला आणले. तपासल्यानंतर सविता यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र कळव्याला हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यासाठी सविताच्या नातेवाइकांनी  १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्या रुग्णवाहिका चालकाने येतो असे सांगितले मात्र त्याला विलंब झाला. 

पालिकेची रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने एकच रुग्ण कळव्याला घेऊन जाणार नाही, असे सांगत महिलेला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यास नकार दिला. रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या सविता यांचा सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच मृत्यू झाला. 

४८ तासांच्या आत चौकशी पूर्ण करणार : उपायुक्तरुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दरवाजात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने मृत्यू झालेल्या महिलेच्या संदर्भात ४८ तासांत चौकशी पूर्ण करून तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन महापालिकेच्या आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले. 

 बोरकर म्हणाले, संबंधित डॉक्टर, रुग्णवाहिकाचालक यांच्यासह जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. चौकशीकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली जाणार आहे.  उपायुक्त बोरकर यांच्या आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी  केली. 

काय म्हणाले डॉक्टर... याप्रकरणी रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही, हे मान्य केले. 

तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही सविताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या विरोधात जोपर्यंत कठाेर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली. हा प्रकार कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह संजय मोरे, संदीप तांबे यांनी रुग्णालयात धाव घेऊन संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  

टॅग्स :kalyanकल्याण