शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

KDMC च्या महासभेत मनसेच्या नगरसेवकांनी मौन का बाळगले? शिवसेना उपजिल्हा प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:49 IST

KDMC : प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काल रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करुन शिवसेनेवर आरोप केले. मात्र मनसेचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मौन का बाळगून होते, असा प्रतिसवाल शिवसेनेजे उप जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

2010 साली मनसेचे 28 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. त्यानंतर 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. गेल्या दहा वर्षाच्या कालावधी महापालिकेत मनसे हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. विरोधी पक्ष नेते पदही मनसेकडे होते. त्यांचा महापालिकेच्या प्रशासनावर वचक असायला हवा होता. त्यांनी तो दबदबा निर्माण केला नाही. महापालिकेच्या स्थायी समितीतही मनसेचे नगरसेवक होते. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून प्रखरपणे आंदोलने करीत असता मनसेचे नगरसेवक महासभेत मौन बाळगून होते. त्यामुळे गेल्या 8 वर्षात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मुद्यावर त्या त्या वेळीच मनसेने त्यांचा प्रखर विरोध का केला नाही असा प्रश्न कदम यांनी यांनी उपस्थित केला आहे. 

रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविले गेल्यास पावसात ते नीट बुजले जात नाही. ते टिकाऊ होत नाही. ही साधी सोपी गोष्ट लोकप्रतिनिधींना समजत नाही याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे. पावसाने विश्रंती घेतल्यावर प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणारच आहेत. मात्र मनसेच्या नगरसेवकांनी महासभेत प्रश्न मांडण्याऐवजी वैयक्तिक फायद्याची राजकारण करीत बसले. पक्षासाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका