शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

KDMC च्या महासभेत मनसेच्या नगरसेवकांनी मौन का बाळगले? शिवसेना उपजिल्हा प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:49 IST

KDMC : प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काल रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करुन शिवसेनेवर आरोप केले. मात्र मनसेचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मौन का बाळगून होते, असा प्रतिसवाल शिवसेनेजे उप जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

2010 साली मनसेचे 28 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. त्यानंतर 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. गेल्या दहा वर्षाच्या कालावधी महापालिकेत मनसे हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. विरोधी पक्ष नेते पदही मनसेकडे होते. त्यांचा महापालिकेच्या प्रशासनावर वचक असायला हवा होता. त्यांनी तो दबदबा निर्माण केला नाही. महापालिकेच्या स्थायी समितीतही मनसेचे नगरसेवक होते. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून प्रखरपणे आंदोलने करीत असता मनसेचे नगरसेवक महासभेत मौन बाळगून होते. त्यामुळे गेल्या 8 वर्षात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मुद्यावर त्या त्या वेळीच मनसेने त्यांचा प्रखर विरोध का केला नाही असा प्रश्न कदम यांनी यांनी उपस्थित केला आहे. 

रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविले गेल्यास पावसात ते नीट बुजले जात नाही. ते टिकाऊ होत नाही. ही साधी सोपी गोष्ट लोकप्रतिनिधींना समजत नाही याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे. पावसाने विश्रंती घेतल्यावर प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणारच आहेत. मात्र मनसेच्या नगरसेवकांनी महासभेत प्रश्न मांडण्याऐवजी वैयक्तिक फायद्याची राजकारण करीत बसले. पक्षासाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका