शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

KDMC च्या महासभेत मनसेच्या नगरसेवकांनी मौन का बाळगले? शिवसेना उपजिल्हा प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:49 IST

KDMC : प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काल रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करुन शिवसेनेवर आरोप केले. मात्र मनसेचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मौन का बाळगून होते, असा प्रतिसवाल शिवसेनेजे उप जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनावर मनसेचा वचक असताना तर त्यांच्या आमदारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती अशी खोचक टीकाही कदम यांनी केली आहे. 

2010 साली मनसेचे 28 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. त्यानंतर 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. गेल्या दहा वर्षाच्या कालावधी महापालिकेत मनसे हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. विरोधी पक्ष नेते पदही मनसेकडे होते. त्यांचा महापालिकेच्या प्रशासनावर वचक असायला हवा होता. त्यांनी तो दबदबा निर्माण केला नाही. महापालिकेच्या स्थायी समितीतही मनसेचे नगरसेवक होते. मनसेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून प्रखरपणे आंदोलने करीत असता मनसेचे नगरसेवक महासभेत मौन बाळगून होते. त्यामुळे गेल्या 8 वर्षात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मुद्यावर त्या त्या वेळीच मनसेने त्यांचा प्रखर विरोध का केला नाही असा प्रश्न कदम यांनी यांनी उपस्थित केला आहे. 

रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविले गेल्यास पावसात ते नीट बुजले जात नाही. ते टिकाऊ होत नाही. ही साधी सोपी गोष्ट लोकप्रतिनिधींना समजत नाही याकडे कदम यांनी लक्ष वेधले आहे. पावसाने विश्रंती घेतल्यावर प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणारच आहेत. मात्र मनसेच्या नगरसेवकांनी महासभेत प्रश्न मांडण्याऐवजी वैयक्तिक फायद्याची राजकारण करीत बसले. पक्षासाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका