शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एमआयडीसीचा बफर झोन कुणी ढापला?

By मुरलीधर भवार | Updated: June 10, 2024 11:32 IST

Dombivali MIDC News: अमूदान कंपनीच्या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीचा बफर झोन कोणी ढापला? असे गळे काढले जात आहेत. पण कल्याण -डोंबिवलीतून वर्षानुवर्षे निवडून येणारे खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर हेच या पातकाला कारणीभूत आहेत.

- मुरलीधर भवार(प्रतिनिधी) 

डाेंबिवली एमआयडीसी १९६० च्या दशकात अस्तित्वात आली. तेव्हा डोंबिवलीची लोकवस्ती कमी होती. त्यावेळी आसपासच्या परिसरात ग्रामपंचायतींकडून कारभार चालवला जात होता. त्यानंतर डोंबिवली नगर परिषद अस्तित्वात आली. पुढे जाऊन कल्याण-डोंबिवली या जुळ्या शहरांची १९८३ साली महापालिका झाली. लोकवस्ती वाढत असताना एमआयडीसी आणि लोकवस्ती यांच्यातील अंतर गळून पडले. एमआयडीसीने बफर झोन बिल्डरांना खाऊ दिला. अमूदान कंपनीच्या भीषण स्फोटानंतर डोंबिवलीचा बफर झोन कोणी ढापला? असे गळे काढले जात आहेत. पण कल्याण -डोंबिवलीतून वर्षानुवर्षे निवडून येणारे खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर हेच या पातकाला कारणीभूत आहेत.

डोंबिवली एमआयडीसीत फेज-१ आणि २ असे दोन भाग आहेत. ३४८ हेक्टर जागेवर ही एमआयडीसी वसली आहे. त्यामध्ये ७५१ कंपन्या आहेत. त्यापैकी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या टेक्सटाइल कंपन्या फेज - १ मध्ये आहेत. रासायनिक कंपन्या फेज - २ मध्ये आहेत. एमआयडीसी स्थापन झाली तेव्हा आसपास विरळ लाेकवस्तीची गावे होती. रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सातनंतर उरतल्यावर कंदील घेऊन डोंबिवलीकरांना घरचा रस्ता शोधावा लागत होता. ग्रामपंचायतीच्या काळात काही घरांना बांधकामाची परवानगी दिली. त्यानंतर नगर परिषदेच्या काळात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बांधकामांना परवानग्या दिल्या. त्यातून सुरूवातीला चार मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. महापालिका काळात बहुमजली इमारतींना परवानगी दिली गेली. शहर विस्तारत असताना बेकायदा बांधकामांची समस्या उद्धवली. ती आजतागायत कायम आहे. बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर आणि भूमाफियांनी हातपाय पसरले. त्यांनी दिसेल ती जागा आपली समजत बेकायदा बांधकामे केली. ही बांधकामे जाऊन एमआयडीसीला कधी टेकली, याचा पत्ता लागलाच नाही. राजकीय मंडळींनी व्होट बँकेसाठी या बेकायदा बांधकामांची पाठराखण केली. अधिकाऱ्यांनीही खिसे भरत त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. एमआयडीसीही तितकीच जबाबदार आहे.

बफर झोनमध्ये झाडे हवी होतीबफर झोनमधील नागरी वसाहतींचा शिरकाव रोखण्यात एमआयडीसीने पुढाकार घेतला नाही. नागरी वस्ती आणि एमआयडीसी यांच्यामध्ये ५०० मीटर अंतराचा बफर झोन ठेवला गेला नाही. त्या जागेत झाडे लावली नाहीत. कंपनीच्या संरक्षक भिंतीना लागून घरे आहेत. सोनारपाडा, आजदे, सागाव, गोलवली  गावे एमआयडीसीतील कंपन्यांच्या नजीक असून, नागरी वस्तीने कंपन्यांना घेराव घातला आहे. याचा पहिला फटका २०१६ साली प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे नागरी वस्तीला बसला. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असे वाटले होते.

बफर झोन गिळणारे मोकळे का?वास्तविक बफर झोन गिळंकृत करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. १५६ धोकादायक रासायनिक कंपन्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे. कंपन्या म्हणतात, ‘आम्ही अगोदर येथे आलो, त्यामुळे आम्ही जागा सोडणार नाही.’ इमारतीमधील लोक म्हणतात, ‘आम्ही घरे सोडून कुठे जाणार? आमचे जीव वाचविण्यासाठी कंपन्या हलवा.’ राज्यकर्त्यांना लोकांकडून मते आणि कंपन्यांकडून मलिदा हवा आहे. ते हा विषय झुलवत ठेवणार. पुन्हा स्फोट झाल्यावर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहणार.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी