शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नावरून परतताना दुचाकीला टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By पंकज पाटील | Updated: May 4, 2023 16:01 IST

पनवेलहून घरी परतत असताना अंबरनाथ एमआयडीसीत घडली घटना

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ एमआयडीसीत अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री लग्नावरून परतणाऱ्या दुचाकीवरील परिवाराला एका टेम्पोने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अंबरनाथमध्ये राहणारे सोमनाथ भंगारे हे आपल्या कुटुंबासोबत पनवेलला लग्न समारंभासाठी गेले होते. तिथून दुचाकीवर परतत असताना अंबरनाथ एमआयडीसीत एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोमनाथ भंगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालू भंगारे आणि तुलसी भंगारे हे दोघे गंभीर जखमी झाले.

या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मालू आणि तुलसी भंगारे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, अंबरनाथ एमआयडीसीत गेल्या चार दिवसात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी ३० एप्रिल रोजी एका टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातambernathअंबरनाथpanvelपनवेल