शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:11 IST

प्रवाशांचा सवाल : उर्मटपणाचा कळस, आरटीओ, वाहतूक पाेलिसांचे दुर्लक्ष

- प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा या सीएनजीवर चालतात. मग ही भाडेदरात वाढ का, असा सवाल प्रवासी करत आहेत. शहरात मीटर पद्धतच संपुष्टात आली आहे. ८० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने धावतात. काेराेना काळात रिक्षात फक्त दाेनच प्रवाशांना परवानगी असताना अनेक रिक्षाचालक चार प्रवासी बसवून दुपटीने भाडेवसुली करत आहेत. कुणी विचारलेच तर मुजाेरी केली जाते. त्यामुळे ही लूट थांबणार की नाही, असा सवाल प्रवासी करता आहेत.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात ४० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील निम्या रिक्षा कल्याण-डोंबिवली परिसरात आहेत. शेअर रिक्षांचे प्रस्थ वाढण्यास प्रवासीही कारणीभूत आहेत. त्यामुळे रिक्षातील मीटर शोभेची यंत्र बनली आहेत. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू करून एक किंवा दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. असे असताना शेअर रिक्षांमध्ये तीन-चार प्रवासी बसवून भाडे दुप्पट वसूल केले जात आहे. पूर्वी १० रुपये आकारले जायचे. आता प्रत्येकी २० रुपये भाडे घेतले जात आहे. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद हाेण्याचे प्रकार वाढले आहेत. 

१ मार्चपासून रिक्षाभाडे तीन रुपयांनी वाढवले. रिक्षा संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे. पण शेअर रिक्षाच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेअर भाड्यात हाेणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी सीएनजी दरही आठ रुपयांनी वाढल्याकडे रिक्षा संघटनांकडून लक्ष वेधले जात आहे. एकीकडे मनमानी भाडे आकारले जात असताना दुसरीकडे भाडे नाकारण्याची प्रवृत्तीही कायम आहे. यात प्रवाशांची पुरती फरफट होत असल्याचे चित्र डोंबिवलीच्या पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळते. आरटीओचे या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे.

पुढाऱ्यांमुळे वाढली चालकांची मुजोरीठाणे :  बेकायदा रिक्षाचालकांचे पेव अनेक शहरांमध्ये फुटले असून, स्थानिक नेते, पुढाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस मुजाेरी वाढली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची नेहमीच पायमल्ली होताना दिसते. त्यांच्या बेदरकार रिक्षा चालविण्यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. काही शहरांमध्ये अल्पवयीन मुले बिनबाेभाट रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे बेदरकारपणा वाढून रिक्षा प्रवास धाेकायदायक बनला आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक पाेलिसांकडून हाेत असलेला कानाडाेळाही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबराेबर त्यांच्या टवाळखाेरीलाही प्रवाशांना सामारे जावे लागत आहे. अनेक रिक्षाचालकांकडे परवाना आणि बॅचही नाहीत. अनेक जण गणवेशही घालत नाहीत. अगदी हाफपॅण्टमध्येही फिरतात. स्टॅण्ड साेडून भाडे भरणे, ताेंडात गुटखा, मद्यपान, गांजाचे व्यसन अशी बेशिस्ती वाढली आहे.