शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागा नावावर एकाच्या, कब्जा दुसऱ्याचा; विरार आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्याचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:08 IST

ज्या शेतकऱ्यांकडे जमीनाचा कब्जा आहे त्यांनाच मोबदला द्यावा

कल्याण-विरार आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात भोपर गावातील १०० शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. प्रकल्पाने बाधित होणाऱ्या जमीनीवर ज्या शेतकऱ्यांचा कब्जा आहे. त्यांना सरकारने मोबदला द्यावा. त्यांना मोबदला दिला नाही तर कल्याण प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आज भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यांनी प्रांत अधिकारी गुजर यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी विश्वास माळी, मधूकर माळी, सुनिल पाटील, शक्ती माळी, जयवंत माळी, तानाजी पाटील, तानाजी माळी, कनिक पाटील आदी उपस्थित होते. काही बिल्डरांनी जागा विकत घेतल्या आहेत. काही प्रकरणात कब्जा माझा आहे. जागा दुसऱ्यांच्या नावे आहे. तर काही जागा दुसऱ्यांच्या नावावर आहे. तर कब्जा आमच्या नावावर आहे. त्यांच्याकडून परस्पर जागेचा मोबदला घेण्याचा प्रयत्न होते.

त्यांना सरकारी मोबदला देऊ नये. जे कब्जेदार आहे. त्यांना मोबदला दिला जावा. काही लोकांनी शेतकऱ्यांला बाजूला टाकून सावकाराला हाताशी धरुन स्वत:च्या नावे जागा केली आहे. अशा लोकांना सरकारने धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखळ केला पाहिजे. काही लोकांनी चिटींगकरुन जागा नावावर केलेल्या आहेत. त्याना मोबदला न देता कष्टकरी शेतकऱ्याला मोबदला द्यावा. या प्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह मनसे आमदार राजू पाटीलय यांच्याकडे ही दाद मागणार आहोत. आम्हाला न्याय मिळाला नाहीत भोपर गावातील बाधित शेतकरी प्रांत कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा संदीप माळी यांनी दिला आहे.

शेककरी मधुकर माळी यांनी सांगितले की, बाधित जागा कोणाच्या कब्जात आहे. कोणाच्या नावार आहे. जो शेतकरी १०० वर्षापासून शेतजमीन कसतो. त्याला न्याय मिळत नसेल तर त्या प्रकरणी दाद मागण्यासाठी प्रांत कार्यालयात आलो होतो.

या प्रकरणी प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी वर्गाने माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच त्याचे निवेदनही स्विकारले आहे. बाधित शेतकरी वर्गाने कब्जा ज्यांचा आहे. त्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या हरकतीनुसार त्यांच्या हरकतीची रितसर सुनावणी घेतल्याशिवाय कोणालाही प्रकल्पाचा माेबदला दिला जाणार नाही.

टॅग्स :kalyanकल्याण