शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

ठरावाविना तेव्हाही वगळली होती गावे - श्रीनिवास घाणेकर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:46 IST

KDMC News : २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

कल्याण - केडीएमसीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय शुक्रवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या वेळी गावे वगळण्याचा ठराव महासभेत केला नसल्याने जाब विचारला आहे. तसेच आयुक्तांचे पत्र म्हणजे महासभेचा ठराव नाही, असे म्हटले आहे. मात्र, २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे.१९८३ पासून २७ गावे मनपामध्ये होती. मात्र, मनपाकडून सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने ही गावे वगळण्याची मागणी जोर धरताच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती मनपातून वगळली. त्या वेळी औद्योगिक परिसर असलेला आजदे व चोळेचा परिसरही वगळला होता. त्या वेळी सरकारच्या निर्णयाविरोधात कौस्तुभ गोखले व श्रीनिवास घाणेकर यांनी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या वेळी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सांगत ती याचिका निकाली काढली होती.घाणेकर म्हणाले, ‘आता १८ गावे वगळण्याची याचिका न्यायप्रविष्ट आहे. याआधी याचिका दाखल केली होती. त्या वेळीही गावे वगळू नयेत, हीच मागणी केली होती. त्या वेळीही महासभेने गावे वगळण्याचा ठराव केला नव्हता. आताही १८ गावे वगळण्याचा ठराव महासभेने केलेला नाही.’न्यायालयाने १८ गावे वगळण्याची प्रक्रिया अयोग्य ठरविल्यास केडीएमसीचे क्षेत्रफळ पूर्वीप्रमाणे होईल. २०१५ मध्ये २७ गावे मनपात समाविष्ट झाली तेव्हा या गावांमध्ये १५ प्रभाग पाडले. त्यामुळे मनपात १२२ प्रभाग झाले. आता १८ गावे वगळण्याची घोषणा केल्याने १३ प्रभाग वगळले गेले आहेत. मनपा निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रभाग रचनेची तयारी बाधित झाली आहे. १८ गावे वगळण्याची प्रक्रिया रद्दबातल झाल्यास प्रभाग रचना बदलावी लागेल. तसेच निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

प्राणघातक हल्ला२००२ मध्ये २७ गावे मनपातून वगळल्यावर तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांच्या दालनात एक बैठक झाली होती. त्यात घाणेकर यांच्यासोबत खडाजंगी झाली होती. संघर्ष समितीचे अध्यक्ष दिवंगत दि. बा. पाटील हे घाणेकर यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर याचिकाकर्ते घाणेकर व गोखले यांच्यावर दोन भिन्न ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून हे दोघेही बचावले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका