शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

उल्हासनगर लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा जास्त? तरीही पाणी टंचाई कशी? आयुक्तांचे कारवाईचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:40 IST

उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत एमआयडीसी कडून जास्तीचा पाणी पुरवठा जास्त होऊनही पाणी टंचाई कशी? असा प्रश्न आयुक्तानी अधिकाऱ्यांना केला. पाण्याचे वितरण समसमान होण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणी चोरट्यावर कारवाईचे संकेत दिल्याने, पाणी चोरांचे धाबे दणाणले आहे. 

उल्हासनगर महापालिकेची लोकसंख्या ७ लाख पेक्षा जास्त असून एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. लोकसंख्येच्या प्रमाणात ९० टक्के एमएलडी पाणी पुरेसे असताना शहराला जास्तीचा पाणी पुरवठा होतो. तरीही शहरांत पाणी टंचाई निर्माण झालीच कशी? असा प्रश्न आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारला आहे. सुभाष टेकडी, मराठा सेकशन, महादेवनगर, गायकवाड पाडा, तानाजीनगर आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊन राजकीय नेते व माजी नगरसेवकांनी महापालिकेला निवेदन देवून कारवाईची मागणी केली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पंपिंग स्टेशन, जलवाहिनी आदीची पाहणी करून अवैध नळ lजोडणीवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.

 पाणीगळतीवर कोट्यावधीचा खर्च महापालिका पाणी गळतीवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणी गळती कायम आहे. त्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यापूर्वी शहरात पाणी पुरवठा टंचाई निर्माण झाल्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. त्यानंतर ३५० कोटीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली असून योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०३ कोटीतून कामे सुरु झाली. तरीही शहरात पाणी टंचाई निर्माण होऊन श्वेतपत्रिका काढण्याची मागणी होत आहे. 

खेमानी परिसरात तलावाचे स्वरूप शहरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असताना खेमानी टेकडी परिसरात रस्त्याहून पाणी वाहत आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याची टीका स्थानिक प्रा. प्रवीण माळवे यांनी केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर