शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना सांगणार काय? उल्हासनगर भकास शहर म्हणत शिंदेसेनेच्या नेत्याने व्यक केली खदखद

By सदानंद नाईक | Updated: August 9, 2024 14:47 IST

उल्हासनगर भकास शहर असून त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदेसेनेच्या नेत्याने केला आहे.

उल्हासनगर : शहराला हजारो कोटीचा निधी देऊनही शहर भकास झाल्याचा आरोप ७५ व्या स्थापना दिवस कार्यक्रम वेळी शिवसेना शिंदेसेनेचे नेते राजेंद्र चौधरी यांनी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत केला. याला महापालिका प्रशासन जबाबदार असून पक्षाकडून जाब विचारणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उल्हासनगर महापालिकेतील विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण करण्यासाठी एका वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील संच्युरी मैदानावर आले होते. शहरविकासासाठी आपण ११५० कोटीचा निधी दिल्याचे सांगून, यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे आश्वासन भाषणत दिले होते. मात्र दिड वर्षानंतरही शहराचा विकास दिसण्या ऐवजी शहर भकास झाल्याचा आरोप सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून अप्रत्यक्ष होत होता. मात्र शहराच्या ७५ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजेंद्र चौधरी यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगून आयुक्त अजीज शेख यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

शहरात कोट्यवधींच्या निधीतून बांधण्यात आलेले रस्ते खोदून ४२६ कोटीच्या निधीतून गटारीचे पाईप टाकले जात आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती नियमानुसार केली नाही. तसेच १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू केले. त्यासाठीही रस्ते खोदण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले. तसेच १२३ कोटीच्या निधीतून पाणी पुरवठा योजना सुरू होत आहे. शासनच्या मूलभूत निधीतून ४८ कोटीची एकून १२६ कामे, त्यानंतरच्या २९ कोटीच्या निधीतून विविध कामे सुरू आहेत. मात्र एकही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र शहरात आहे. एकूणच अर्धवट विकास कामामुळे शहर भकास दिसत असल्याचा आरोप शिवसेना शिंदेगटाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी केला.

नागरिकांना सांगणार काय... राजेंद्र चौधरी

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून नागरिकांना शहर विकासाबाबत सांगणार काय? असा प्रश्न शिंदेसेनेचे नेते राजेंद्र चौधरी यांनी केला. रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, विकास कामाचा बोजवारा, महापालिकेतील अर्धेअधिक पदे रिक्त, अवैध बांधकामे आदींचा प्रश्न चौधरी यांनी केले. 

आयलानी यांना अप्रत्यक्ष टोला 

शहराचे आमदार कुमार आयलानी यांनी शहर विकासासाठी किती निधी आणला?. अर्धवट कामाबाबत आक्रमकता नाही. असे अप्रत्यक्ष आरोप केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेulhasnagarउल्हासनगर