शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डोंबिवलीत मोदी सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून निषेध, घोषणाबाजी

By अनिकेत घमंडी | Updated: July 18, 2024 14:44 IST

केंद्र सरकारच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला.

अनिकेत घमंडी/ डोंबिवली: काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले असून काहीजण जखमी झाले असल्याने गुरुवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गुरुवारी तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी करत शिवसेना पक्षाने निषेध व्यक्त केला.

२०१४पासून मोदी सरकारच्या काळात कित्येक वेळा भारतावर आतंकवादी हल्ले झाले आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका भारत सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सोसावे आणि भोगावे लागत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज डोंबिवलीत जाहीर निषेध करण्यात आला. कारण मागील 38 दिवसांमध्ये भारतावर दहशतवाद्यांकडून नऊ ते दहा हल्ले करण्यात आले. यामध्ये भारताचे १२जवान शहीद झाले तर १३ जण जखमी झाले आहेत. तसेच १० सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला तर ४४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे देश रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या फेकू प्रधानमंत्री म्हणून विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, विधानसभा संघटक सुरेश परदेशी, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजीत सावंत, उपशहर प्रमुख अभिजीत थरवळ युवा शहराधिकारी प्रसाद टूकरूळ यांच्या नेतृत्वाखाली सतीश मोडक राहुल भगत, अभिजीत सोळकर ,सुदर्शन जोशी ,आणि यश सोनी यासह शिवसैनिक यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली