शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने रंगला दोनशे तासांचा अखंड वाचन यज्ञ

By अनिकेत घमंडी | Updated: October 17, 2023 19:40 IST

कल्याणमध्ये बालक मंदिर शाळेत झाला उपक्रम बाराशे वाचकांचा सहभाग

अनिकेत घमंडी, डोंबिवली-कल्याण: मुलांनी वाचनाकडे वळावे या हेतूने अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अखंड ३६ तासांचा वाचन यज्ञ प्रल्हाद केशव अत्रे नगरी बालक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये २२ शाळा आणि ४० हून अधिक वाचन विषयक कार्य करणाऱ्या संस्थांसह १२०० वाचकांनी विविध वाचन सत्रामध्ये उपस्थित राहून वाचन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी झाले तर समारोप रविवारी मध्यरात्री झाला.

शुभारंभाच्या सत्रामध्ये प्रख्यात अभिनेते व कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले की वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले. साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले. त्या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले.

या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचा समारोप सत्रामध्ये बोलताना कुटुंब रंगलंय काव्यात फेम विसुभाऊ बापट आपल्या भाषणात कुटुंब रंगलंय काव्यात ची जन्मकथा उलगडवून दाखविताना म्हणाले की वाचनामुळे मला कविता कशी वाचावी त्यावर संस्कार कसे करावे हे कळलं आणि त्यातून कुटुंब रंगलय काव्यात या विश्व विक्रमी कार्यक्रमाची निर्मिती झाली. आपल्या भाषणात त्यांनी काव्यवाचन विषयक अनेक दाखले, किस्से सांगून विविध कविता सादर केल्या आणि कार्यक्रमात रंग भरला. मोबाईल फोन, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या आजच्या युगात वाचनाची सवय आता खूप कमी होत चालली आहे. मात्र त्यांच्या वापराबाबत स्वतःला अनुशासन लावणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांमध्ये वाचन, व्यायाम, मैदानी खेळ ह्यांचा डिजिटल उपकरणांच्या वापराशी समतोल साधला गेला पाहिजे, असे विचार प्रख्यात शल्य विशारद डॉ आशिष धडस यांनी समारोप सत्रात मांडले. या प्रसंगी मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे , महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निमिष कुलकर्णी व बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह डॉ सुश्रुत वैद्य यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी, डॉ प्रकाश माळी यांनी केले व आभार प्रदर्शन हेमंत नेहते यांनी केले. 

सलग ३६ तास आणि एकत्रित २०० हून अधिक तास रंगलेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र, मंगला नारळीकर वाचन सत्र , शांताबाई शेळके वाचनसत्र , कवी केशवसुत वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, वामनदादा कर्डक वाचनसत्र, अण्णाभाऊ साठे वाचनसत्र डॉ.ए पी वाचन सत्र, जी . ए.कुलकर्णी वाचनसत्र, गंगाधर गाडगीळ वाचन सत्र , सुधाताई करमरकर वाचनसत्र ना. धो. महानोर वाचनसत्र , नलेश पाटील सत्र अशा विविध सत्रांमध्ये कथा, कविता , ललित , नाट्य , एकांकिका , लेख आदी विविध साहित्य प्रकार सादर केल्याची माहिती संस्था सचिव हेमंत नेहते यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली