शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने रंगला दोनशे तासांचा अखंड वाचन यज्ञ

By अनिकेत घमंडी | Updated: October 17, 2023 19:40 IST

कल्याणमध्ये बालक मंदिर शाळेत झाला उपक्रम बाराशे वाचकांचा सहभाग

अनिकेत घमंडी, डोंबिवली-कल्याण: मुलांनी वाचनाकडे वळावे या हेतूने अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अखंड ३६ तासांचा वाचन यज्ञ प्रल्हाद केशव अत्रे नगरी बालक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये २२ शाळा आणि ४० हून अधिक वाचन विषयक कार्य करणाऱ्या संस्थांसह १२०० वाचकांनी विविध वाचन सत्रामध्ये उपस्थित राहून वाचन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी झाले तर समारोप रविवारी मध्यरात्री झाला.

शुभारंभाच्या सत्रामध्ये प्रख्यात अभिनेते व कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले की वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले. साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले. त्या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले.

या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचा समारोप सत्रामध्ये बोलताना कुटुंब रंगलंय काव्यात फेम विसुभाऊ बापट आपल्या भाषणात कुटुंब रंगलंय काव्यात ची जन्मकथा उलगडवून दाखविताना म्हणाले की वाचनामुळे मला कविता कशी वाचावी त्यावर संस्कार कसे करावे हे कळलं आणि त्यातून कुटुंब रंगलय काव्यात या विश्व विक्रमी कार्यक्रमाची निर्मिती झाली. आपल्या भाषणात त्यांनी काव्यवाचन विषयक अनेक दाखले, किस्से सांगून विविध कविता सादर केल्या आणि कार्यक्रमात रंग भरला. मोबाईल फोन, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या आजच्या युगात वाचनाची सवय आता खूप कमी होत चालली आहे. मात्र त्यांच्या वापराबाबत स्वतःला अनुशासन लावणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांमध्ये वाचन, व्यायाम, मैदानी खेळ ह्यांचा डिजिटल उपकरणांच्या वापराशी समतोल साधला गेला पाहिजे, असे विचार प्रख्यात शल्य विशारद डॉ आशिष धडस यांनी समारोप सत्रात मांडले. या प्रसंगी मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे , महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निमिष कुलकर्णी व बालक मंदिर संस्थेचे कार्यवाह डॉ सुश्रुत वैद्य यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी, डॉ प्रकाश माळी यांनी केले व आभार प्रदर्शन हेमंत नेहते यांनी केले. 

सलग ३६ तास आणि एकत्रित २०० हून अधिक तास रंगलेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र, मंगला नारळीकर वाचन सत्र , शांताबाई शेळके वाचनसत्र , कवी केशवसुत वाचनसत्र, नारायण धारप वाचनसत्र, वामनदादा कर्डक वाचनसत्र, अण्णाभाऊ साठे वाचनसत्र डॉ.ए पी वाचन सत्र, जी . ए.कुलकर्णी वाचनसत्र, गंगाधर गाडगीळ वाचन सत्र , सुधाताई करमरकर वाचनसत्र ना. धो. महानोर वाचनसत्र , नलेश पाटील सत्र अशा विविध सत्रांमध्ये कथा, कविता , ललित , नाट्य , एकांकिका , लेख आदी विविध साहित्य प्रकार सादर केल्याची माहिती संस्था सचिव हेमंत नेहते यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली