शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पाण्यासाठी माझं अख्खं कुटुंब बुडालं, आता मी कुणासाठी जगू?; कुटुंबप्रमुख अक्षरशः ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:36 IST

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

मुरलीधर भवार । डोंबिवली 

माझी मुले पाण्यासाठी वणवण फिरत होती. उन्हातान्हात फिरत होती. पाणी येत नसल्याने खदानीवर कपडे धुण्यासाठी माझी मुले, आई आणि भावजयीसोबत गेली. सोबत माझा पुतण्याही होता. त्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी माझे कुटुंब बुडाले. आता मी काय करू आणि कोणासाठी जगू? आता तरी आम्हाला पाणी मिळणार आहे की नाही? पाणी मिळाले तरी माझी आई, भावजय, मुले आणि पुतण्या परत येणार नाहीत... हे सांगताना पाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्य गमावलेला जन्मदाता मनीष गायकवाड याला शोक अनावर झाला. तो ढसाढसा रडला. तेव्हा रुग्णालयात जमलेला जमावही नि:शब्द बनला होता.

देसलेपाडा गायकवाडवाडीत राहणारे मनीष गायकवाड हे रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गायकवाडवाडी परिसरात पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने त्यांची आई नीरा, भावजय अपेक्षा, मुलगा मयुरेश आणि मोक्ष, पुतण्या सिद्धेश हे पाचजण शनिवारी दुपारी भोपर देसलेपाडा आणि संदप या गावाच्या वेशीवर असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुण्यासाठी खदानीवर हे पाच जणच होते. अन्य कोणी नव्हते. कपडे धुण्याआधीच पाच जणांपैकी एक खदानीत पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य चार जणांनी प्रयत्न केले. तेव्हा एकापाठोपाठ पाचही जणांना जलसमाधी मिळाली. त्याठिकाणी त्यांचे कपडे तसेच पडून होते. सोबत नेलेली दुचाकी आणि सायकलही त्याठिकाणी पडून होती. अग्निशमन दलाने पोहोचून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा ते एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात मिठ्या मारून असलेल्या अवस्थेत आढळून आले.

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. त्यामुळे संपर्कच करता आला नाही. काय झाले हे पाहण्यासाठी गावातील एक मुलगा खदानीवर गेला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

पाणी येत नसल्याने रिक्षा चालविणारे मनीष यांच्यावर पाचशे ते हजार रुपयांचा टॅंकर मागविण्याची वेळ यायची. रिक्षा चालविणाऱ्यास दररोज टॅंकरचा खर्च कसा परवडणार? मग कपडे धुण्यासाठी आमच्या घरच्यांना खदानीत जावे लागायचे. पाणीटंचाईने माझ्या कुटुंबांचा जीव घेतला असे मनीष यांनी सांगितले.