शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

पाण्यासाठी माझं अख्खं कुटुंब बुडालं, आता मी कुणासाठी जगू?; कुटुंबप्रमुख अक्षरशः ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:36 IST

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

मुरलीधर भवार । डोंबिवली 

माझी मुले पाण्यासाठी वणवण फिरत होती. उन्हातान्हात फिरत होती. पाणी येत नसल्याने खदानीवर कपडे धुण्यासाठी माझी मुले, आई आणि भावजयीसोबत गेली. सोबत माझा पुतण्याही होता. त्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी माझे कुटुंब बुडाले. आता मी काय करू आणि कोणासाठी जगू? आता तरी आम्हाला पाणी मिळणार आहे की नाही? पाणी मिळाले तरी माझी आई, भावजय, मुले आणि पुतण्या परत येणार नाहीत... हे सांगताना पाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्य गमावलेला जन्मदाता मनीष गायकवाड याला शोक अनावर झाला. तो ढसाढसा रडला. तेव्हा रुग्णालयात जमलेला जमावही नि:शब्द बनला होता.

देसलेपाडा गायकवाडवाडीत राहणारे मनीष गायकवाड हे रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गायकवाडवाडी परिसरात पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने त्यांची आई नीरा, भावजय अपेक्षा, मुलगा मयुरेश आणि मोक्ष, पुतण्या सिद्धेश हे पाचजण शनिवारी दुपारी भोपर देसलेपाडा आणि संदप या गावाच्या वेशीवर असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुण्यासाठी खदानीवर हे पाच जणच होते. अन्य कोणी नव्हते. कपडे धुण्याआधीच पाच जणांपैकी एक खदानीत पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य चार जणांनी प्रयत्न केले. तेव्हा एकापाठोपाठ पाचही जणांना जलसमाधी मिळाली. त्याठिकाणी त्यांचे कपडे तसेच पडून होते. सोबत नेलेली दुचाकी आणि सायकलही त्याठिकाणी पडून होती. अग्निशमन दलाने पोहोचून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा ते एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात मिठ्या मारून असलेल्या अवस्थेत आढळून आले.

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. त्यामुळे संपर्कच करता आला नाही. काय झाले हे पाहण्यासाठी गावातील एक मुलगा खदानीवर गेला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

पाणी येत नसल्याने रिक्षा चालविणारे मनीष यांच्यावर पाचशे ते हजार रुपयांचा टॅंकर मागविण्याची वेळ यायची. रिक्षा चालविणाऱ्यास दररोज टॅंकरचा खर्च कसा परवडणार? मग कपडे धुण्यासाठी आमच्या घरच्यांना खदानीत जावे लागायचे. पाणीटंचाईने माझ्या कुटुंबांचा जीव घेतला असे मनीष यांनी सांगितले.