शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी माझं अख्खं कुटुंब बुडालं, आता मी कुणासाठी जगू?; कुटुंबप्रमुख अक्षरशः ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:36 IST

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

मुरलीधर भवार । डोंबिवली 

माझी मुले पाण्यासाठी वणवण फिरत होती. उन्हातान्हात फिरत होती. पाणी येत नसल्याने खदानीवर कपडे धुण्यासाठी माझी मुले, आई आणि भावजयीसोबत गेली. सोबत माझा पुतण्याही होता. त्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी माझे कुटुंब बुडाले. आता मी काय करू आणि कोणासाठी जगू? आता तरी आम्हाला पाणी मिळणार आहे की नाही? पाणी मिळाले तरी माझी आई, भावजय, मुले आणि पुतण्या परत येणार नाहीत... हे सांगताना पाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्य गमावलेला जन्मदाता मनीष गायकवाड याला शोक अनावर झाला. तो ढसाढसा रडला. तेव्हा रुग्णालयात जमलेला जमावही नि:शब्द बनला होता.

देसलेपाडा गायकवाडवाडीत राहणारे मनीष गायकवाड हे रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गायकवाडवाडी परिसरात पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने त्यांची आई नीरा, भावजय अपेक्षा, मुलगा मयुरेश आणि मोक्ष, पुतण्या सिद्धेश हे पाचजण शनिवारी दुपारी भोपर देसलेपाडा आणि संदप या गावाच्या वेशीवर असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुण्यासाठी खदानीवर हे पाच जणच होते. अन्य कोणी नव्हते. कपडे धुण्याआधीच पाच जणांपैकी एक खदानीत पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य चार जणांनी प्रयत्न केले. तेव्हा एकापाठोपाठ पाचही जणांना जलसमाधी मिळाली. त्याठिकाणी त्यांचे कपडे तसेच पडून होते. सोबत नेलेली दुचाकी आणि सायकलही त्याठिकाणी पडून होती. अग्निशमन दलाने पोहोचून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हा ते एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात मिठ्या मारून असलेल्या अवस्थेत आढळून आले.

पाणी येत नसल्याने कपडे धुण्यासाठी गायकवाड कुटुंबीय खदानीवर जायचे. काल नेमके ते मोबाईल घरीच विसरले होते. त्यामुळे संपर्कच करता आला नाही. काय झाले हे पाहण्यासाठी गावातील एक मुलगा खदानीवर गेला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पाचही जण बुडाल्याचे कळताच गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

पाणी येत नसल्याने रिक्षा चालविणारे मनीष यांच्यावर पाचशे ते हजार रुपयांचा टॅंकर मागविण्याची वेळ यायची. रिक्षा चालविणाऱ्यास दररोज टॅंकरचा खर्च कसा परवडणार? मग कपडे धुण्यासाठी आमच्या घरच्यांना खदानीत जावे लागायचे. पाणीटंचाईने माझ्या कुटुंबांचा जीव घेतला असे मनीष यांनी सांगितले.