शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ज्या शहराने राजकीय ओळख दिली त्या डोंबिवलीशी नाळ घट्ट करा : विवेक पंडित

By अनिकेत घमंडी | Updated: June 15, 2024 09:29 IST

विद्यानिकेतन शाळेचा फलक ठरतोय लक्षवेधी 

 डोंबिवली: शहरातील सीसी रस्त्यांची सुरू असलेली कूर्म गतीने कामे, रेल्वेचा जीवघेणा प्रवास, शहरातील नागरी समस्या, ट्रॅफिक जाम यामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना हवाय दिलासा, समाधान.त्यासाठी निवडणूका झाल्या, निकाल।लागले निदान आता तरी राजकीय पक्षनेते मंडळींनी ज्या शहराने राजकीय ओळख दिली त्या शहराशी काही वेळ नाळ घट्ट करावी असे फलक विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी त्यांच्या स्कुल बस मागे लावले आहेत, ते अतिशय लक्षवेधी ठरत आहेत.पंडित नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवतात. शहरातील नागरी समस्यांना ते त्यांच्या माध्यमातून आवाज उठवतात, काही प्रमाणात फरक पडतो, परंतु पुन्हा स्थिती जैसे थे होते, पण त्यामुळे आपण आपले जनजागृतीचे काम।सोडायचे नाही असे पंडित म्हणाले. केवळ।नेतेमंडळी नव्हे तर सर्वच शासकीय यंत्रणा देखील त्याला जबाबदार असून नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचे ते म्हणाले. लाखो रुपये खर्च करून कल्याण शीळ बांधला, अल्पावधित तो खणला, मेट्रोचे नियोजन शासकीय मंडळींनी दिले नाही का? मेट्रो खर तर शहरातील मंडळींना किती उपयोगाला येणार आहे हे।देखील प्रश्नच असल्याचे पंडित म्हणाले. जागोजागी सीसी रस्त्याची कामे सुरू असून त्याबद्दल बोलायची सोय नाही. पर्यायी रस्ते नको का द्यायला? असा सवाल त्यांनी केला. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशी स्थिती आहे, गंभीर चित्र असून वाहतूक कोंडीवर कोणताही ऍक्शन प्लॅन नाही अशी शहर कशी पुढे जातील याची चिंता त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे लोकप्रतिनिधी नात्याने सर्वपक्षीय नेत्यांनी या शहराशी असलेली बांधिलकी सिद्ध करण्याची वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक झाली राजकीय धुळवड थांबली असून पक्षाशी जशी निष्ठा बाळगता तशी शहराविषयी दाखवावी, या शहरांनी ओळख दिली आहे हे विसरू नका अशी खोचक टीका त्यांनी।केली. डोंबिवलीकर नागरिकांना मेट्रोची संधी कमी।मिळणार असून त्यासाठी।कल्याण शीळ रस्ता नव्याने।केला आणि उखडला हे संयुक्तिक वाटत नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास नसावा असेही ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली त्रास नसावा, समस्या।सुटावी वाढू नये असे ते म्हणाले.सर्वपक्षीय मंडळींनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शहरांसाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी या निमित्ताने।केले. अखेरीस ते म्हणाले।की, जनतेसाठी केलेले चांगले काम, जनता, योग्य ठिकाणी व्यक्त करतेच असा टोलाही त्यांनी नुकत्याच लोकसभा निकालाच्या आकड्यांचा थेट उल्लेख न करता त्याचाच आधार घेत लगावला. आणि नकळतपणे आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका असल्याने नेतेमंडळीना सावध केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSchoolशाळा