शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून आता राष्ट्रवादी पिंजून काढणार ठाणे जिल्हा

By मुरलीधर भवार | Updated: September 27, 2023 14:47 IST

या अभियानाची सुरुवात 30 सप्टेंबरला मुरबाडमधील माळ गट तर १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून दिपक वाकचौडे आणि नामदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने केली जाणार आहे.

कल्याण- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहीत पवार यांच्या झंजावाती दौऱ्यानंतर आता शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा पिंजून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. मुरबाडमधील माळ आणि वैशाखरे गटापासून या संपर्क अभियानाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीचे युवा आणि फायर ब्रँड नेते आमदार रोहीत पवार यांनी नुकताच कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा झंजावाती दौरा केला. रोहीत पवारांच्या या दौऱ्यानंतर इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले असून पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपले आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

मधल्या काळात अजित दादांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेला कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील पवार साहेबांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद संपर्क अभियान राबवणार असल्याचे महेश तपासे यावेळी म्हणाले.

या अभियानाची सुरुवात 30 सप्टेंबरला मुरबाडमधील माळ गट तर १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून दिपक वाकचौडे आणि नामदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांचे विचार पोहोचवण्याचे आणि त्याद्वारे आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ग्राम सदस्य आजी माजी सरपंच व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते जोडण्याचे काम केले जाणार आहे. तसेच शरद पवारांनी गेल्या ५० - ५५ वर्षांत केलेली विकासकामे, राजकीय विषय, सामाजिक विषय आदी मुद्दे या अभियानाद्वारे पोहचवले जाणार असल्याचेही तपासे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkalyanकल्याण