शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे

By सचिन सागरे | Updated: February 10, 2024 20:42 IST

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार;

कल्याण : अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रात निष्ठेने स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती फार कमी झाली आहे. एखादा चांगला लेखक कधी विस्मृतीत जाईल हे सांगता येत नाही. आपल्या एखाद्या विरोधकाला आयुष्यातून कसे उठवता येईल यासाठी चंग बांधले जातात हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, गटातटाचे राजकारण मराठी साहित्य विश्वातील आपले वाड्मय कलुषित करणारी कृती वाटत असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी येथे व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय, कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी, कथाकार दि. बा. मोकाशी व कविवर्य माधवानुज पुरस्कार आणि दिवाळी अंक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला. यावेळी, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

प्राध्यापक होण्याची इच्छा काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. त्यामुळे, ५० वर्षांपूर्वी लिहायला सुरुवात केली. त्यावेळी, काळाची अनुकुलता खूप लाभली. त्याकाळात आजच्या सारखी प्रसार माध्यमे नव्हती. त्यामुळे, सुसंस्कृत लोकांचे वाचन हे एकमेव करमणुकीचे साधन होते. मराठी मासिकांच्या चलतीचा काळ असल्याने मला मोठ्या प्रमाणात वाचक मिळाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. 

टॅग्स :literatureसाहित्य