शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे

By सचिन सागरे | Updated: February 10, 2024 20:42 IST

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार;

कल्याण : अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रात निष्ठेने स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती फार कमी झाली आहे. एखादा चांगला लेखक कधी विस्मृतीत जाईल हे सांगता येत नाही. आपल्या एखाद्या विरोधकाला आयुष्यातून कसे उठवता येईल यासाठी चंग बांधले जातात हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, गटातटाचे राजकारण मराठी साहित्य विश्वातील आपले वाड्मय कलुषित करणारी कृती वाटत असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी येथे व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय, कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी, कथाकार दि. बा. मोकाशी व कविवर्य माधवानुज पुरस्कार आणि दिवाळी अंक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला. यावेळी, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

प्राध्यापक होण्याची इच्छा काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. त्यामुळे, ५० वर्षांपूर्वी लिहायला सुरुवात केली. त्यावेळी, काळाची अनुकुलता खूप लाभली. त्याकाळात आजच्या सारखी प्रसार माध्यमे नव्हती. त्यामुळे, सुसंस्कृत लोकांचे वाचन हे एकमेव करमणुकीचे साधन होते. मराठी मासिकांच्या चलतीचा काळ असल्याने मला मोठ्या प्रमाणात वाचक मिळाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. 

टॅग्स :literatureसाहित्य