शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे

By सचिन सागरे | Updated: February 10, 2024 20:42 IST

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार;

कल्याण : अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रात निष्ठेने स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती फार कमी झाली आहे. एखादा चांगला लेखक कधी विस्मृतीत जाईल हे सांगता येत नाही. आपल्या एखाद्या विरोधकाला आयुष्यातून कसे उठवता येईल यासाठी चंग बांधले जातात हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, गटातटाचे राजकारण मराठी साहित्य विश्वातील आपले वाड्मय कलुषित करणारी कृती वाटत असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी येथे व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय, कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी, कथाकार दि. बा. मोकाशी व कविवर्य माधवानुज पुरस्कार आणि दिवाळी अंक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला. यावेळी, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

प्राध्यापक होण्याची इच्छा काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. त्यामुळे, ५० वर्षांपूर्वी लिहायला सुरुवात केली. त्यावेळी, काळाची अनुकुलता खूप लाभली. त्याकाळात आजच्या सारखी प्रसार माध्यमे नव्हती. त्यामुळे, सुसंस्कृत लोकांचे वाचन हे एकमेव करमणुकीचे साधन होते. मराठी मासिकांच्या चलतीचा काळ असल्याने मला मोठ्या प्रमाणात वाचक मिळाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. 

टॅग्स :literatureसाहित्य