शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिक्षिकेने जय शिवराय जय श्रीराम लिहिलेले पोस्टकार्ड फाडले; राजकीय पक्षांसह हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेत घातला गोंधळ

By मुरलीधर भवार | Updated: December 9, 2023 18:40 IST

शिक्षिकेने मागीतली माफी

कल्याण-कल्याणमधील एका नामांकीत शाळेत शिक्षिकेकडून एका विद्यार्थ्यांचे पोस्ट कार्ड फाडल्याच्या आरोपानंतर हिंदूवादी संघटना तसेच भाजप, मनसे, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आक्रमक झाले होते .. या पाेस्ट कार्डवर जय शिवराय, जय श्रीराम असे लिहिले होेते. हिंदूवादी संघटनांनी शाळेत हनुमान चाळीसाचे पठण करत जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत आंदोलन केले . पोस्टकड फाडणारे शिक्षकेला निलंबित करण्याची मागणी केली. अखेर शाळा प्रशासनाने व संबंधित शिक्षिकेने घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत झाले .

कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरातील सेंट थॉमस शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टकार्ड फाडले . या पोस्टकार्डवर जय श्रीराम जय शिवराय असा मजकूर लिहलेला होता .या घटनेनंतर आज बजरंग दल भाजप मनसे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली . संबंधित शिक्षकेने जाणीवपूर्वक हे पोस्टर पाडल्याचा आरोप करत या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली . या दरम्यान या कार्यकर्त्यांनी शाळेत हनुमान चालीसा पठण करत जय शिवराय जय श्रीराम घोषणा दिल्या . त्यामुळे काही वेळेपूरती शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली . भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. संबंधित शिक्षकेने माफी मागावी अशी मागणी केली .

याप्रकरणी शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली तर संबंधित शिक्षकेने माफी मागितली . त्यानंतर हे प्रकरण शांत झालं . याबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी असा प्रकार पुन्हा कुठे घडता कामा नये, गुरु म्हणजे आमचे दैवत आणि जर गुरु असे कृत्य करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही , छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे, घडला प्रकार अयोग्य होता. शाळेने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत . या पुढे अशी कोणती गोष्ट घडणार नाही याची हमी शाळा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण