शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

By सचिन सागरे | Updated: March 12, 2024 18:47 IST

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे, अर्थसंकल्पविषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. जाखड़ यांनी दिली.

कल्याण : मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी मंगळवारी केले, ‘मेरा युवा भारत’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रेस क्लब, कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ‘महापालिका कामकाज व महापालिकेचा अर्थसंकल्प’ या विषयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत आयोजित केलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना डॉ. जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.

यावेळी, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव व उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी, सचिव अतुल फडके तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे, अर्थसंकल्पविषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. जाखड़ यांनी दिली. यासमयी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त डॉ. जाखड़ व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहितीपूर्ण उत्तरे दिली.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे उपायुक्त जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, नियमावली, संस्थेची कर्तव्य याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी चव्हाण यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक कसे तयार होते, त्यात काय तरतुदी असतात याचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केले.

"माय युवा भारत" हे शासनाचं डिजिटल व्यासपीठ असून सर्व युवा वर्गाला एकमेकांना जोडण्यासाठी तुमच्या देण्यासाठी केंद्र शासनाने हे डिजिटल व्यासपीठ तयार केले असून युवा वर्गाने ‘मेरा युवा भारत’ या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकेत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे यांनी केले.