शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2024 14:23 IST

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते.

कल्याण : मागील लोकसभा निवडणुकीत ४८.०५ टक्के मतदान झाल्याने देशात दुसऱ्या क्रमांकाचे कमी मतदान करणारा मतदारसंघ असा ‘विक्रम’ येथील मतदारांनी नोंदवला होता. यावेळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कल्याण मतदारसंघात ४१.७० टक्के मतदान झाले असल्याने मागील निवडणुकीपेक्षा कमी मतदान करून मतदानात पिछाडीवर राहण्याचा ‘विक्रम’ पुन्हा येथील मतदार नोंदवणार आहेत. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होणे, अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानामुळे मतदान केंद्रांवर तासनतास तिष्ठत राहावे लागणे, या निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराने मतदारांच्या निरुत्साहात भर घातल्यानेच कल्याण मतदारसंघात कमीतकमी मतदान झाले.

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. मात्र, मागील दोन-तीन निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर येथील सुशिक्षित मतदार मतदानाबाबत अतिशय निरुत्साही आहेत. अनेक मतदार सुट्टी लागल्याने बाहेर निघून जातात. सोमवारी सकाळपासून कल्याणमधील काही भागात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली येथील अनेक भागातील मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी जाऊन तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. डोंबिवलीत ज्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांकडे निवडणूक आयोगाची जुनी ओळखपत्रे आहेत, त्यांची एका विशिष्ट सिरीजमधील नावे यादीतून गायब असल्याचे स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत निवडणूक विभाग समाधानकारक स्पष्टीकरण देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळा, घामाच्या धारा, तीन तासांची प्रतीक्षाप्रचंड उन्हाळा, घामाच्या धारा आणि मतदान केंद्रांवर किमान दोन ते तीन तासांची प्रतीक्षा अशा परिस्थितीमुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रांवर जात होते. परंतु, येथे आपल्याला मतदानाला दीर्घकाळ लागेल हे लक्षात येताच तेथून माघारी जात होते. ८४ वर्षांच्या आजींना केले मृत घोषितउल्हासनगरातील सुभाष टेकडी येथील सुमित्रा टाले या ८४ वर्षीय आजींना निवडणूक यंत्रणेने मृत घोषित केले होते. त्या मतदानाला गेल्या तेव्हा ही नोंद पाहून त्यांना धक्का बसला. आपण जिवंत असून मतदान केल्याखेरीज जाणार नाही, असा पवित्रा टाले यांनी घेतल्याने निवडणूक विभागाने त्यांना मतदान करू दिले.पोई आदिवासी गावाचा बहिष्कारपोई या आदिवासी पाड्याला रस्त्याने जोडण्यात न आल्याने या आदिवासी पाड्यावरील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान