शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण

By सचिन सागरे | Updated: April 2, 2024 17:55 IST

एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले.

कल्याण : एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिस या आजाराचा सामना करणाऱ्या, रक्तवाहिन्यांमध्ये गॅस होणे व त्याचबरोबर अनेक अवयव निकामी होण्याच्या समस्येशी झुंजणाऱ्या एका ३२ वर्षीय महिला रुग्णाची स्थिती २४ तासांमध्ये स्थिर करण्यात एका खाजगी रुग्णालयातील पथकाने यश मिळविले. या रुग्णालयातील कन्सल्टन्ट - युरोलॉजी डॉ. प्रदीप व्यवहारे आणि कन्सल्टन्ट- इन्टेन्सिव्ह केअर डॉ. संदीप पाटील या तज्ज्ञ चिकित्सकांनी आपल्या टीमच्या साथीने रुग्णावर उपचार केले.

एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले. मात्र घरी परतल्यावर या वेदना असह्य झाल्या. त्यांना डाव्या बगलेत वेदना होत असल्याचे आणि उलट्या होत असल्याचे पूर्वनिरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब अतिशय खाली गेला होता, अस्वस्थता जाणवत होती, साखरेची पातळी वाढली होती आणि पहिल्यांदाच डायबेटिसचे निदान झाले होते. त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले आणि त्यातून त्यांना ‘एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिस’ मूत्रपिंडाच्या उतींना झालेला उतींचा ऱ्हास करणारा संसर्ग झाल्याचे आणि त्यासोबतच मूत्रपिंडाच्या नसांमध्ये वायू असल्याचे निदान झाले.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि शस्त्रक्रियेनंतर २४ तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांचा रक्तदाब, क्रिएटाइन, प्लेटलेट आणि साखरेची पातळी पूर्ववत झाली, डायलिसिसची गरज भासली नाही.

या आजारामध्ये, मूत्रपिंडाचा प्रत्यक्ष कार्यरत भाग, ग्रहण यंत्रणा किंवा मूत्रपिंडाच्या परिक्षेत्रामध्ये गॅसेस तयार होतात. ज्यामुळे संसर्गजन्य उतींचा मृत्यू उद्भवतो. हे प्रामुख्याने मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे घडते आणि अनिर्बंध डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे युरोलॉजी डॉ. प्रदीप व्यवहारे यांनी सांगितले.

रुग्णाची स्थिती स्थिर केल्यानंतर त्यांच्या पॅरेन्किमामध्ये तसेच रक्तवाहिन्यांमध्ये गॅसेस तयार झाल्याचे आमच्या लक्षात आले. यामुळे त्यांची किडनी जवळ-जवळ पूर्णपणे खराब झाली होती. ही एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिसची एक दुर्मिळ स्थिती होती. ज्यात रुग्णाला रक्तवाहिन्याममध्ये गॅस तयार होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी किडनी काढून टाकावी लागली. मात्र, त्यांच्या त्यावेळच्या स्थितीमुळे ही शस्त्रक्रिया गुंतागूंतीची ठरली, तरीही सेप्टिसेमिया आणि मल्टि-ऑर्गन फेल्युअरचे मूळ नष्ट करण्यासाठी ती गरजेची होती असे -इंन्टेन्सिव्ह केअर डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले.

माझ्या पोटामध्ये तीव्र वेदना होत होत्या, धाप लागत होती आणि आपल्यासोबत काय घडते आहे हे मला समजत नव्हते. माझी तब्येत अधिकाधिक खालावत चालली होती. चटकन झालेले निदान आणि तत्काळ मिळालेले उपचार यामुळे मला नवे जीवनदान मिळाल्याचे रुग्ण वृषाली मथुरे यांनी सांगितले.---

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर