शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी

By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2023 18:10 IST

संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती.

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान १८ गावे वगळण्याच्या विषयावरी याचिकेवर अंतिम सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार असून राज्य सरकार, केडीएमसी आणि याचिकाकर्ते यांनी दोन पानी महत्वाचे मुद्दे न्यायालयास सादर करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती. या मागणीनुसार महाविकास आघाडी सरकारने २७ पैकी १८ गावे वगळण्याच निर्णय घेतला. या निर्णलाला याचिकाकर्ते पाटील यांनी आक्षेप घेत ही गावे वगळण्यात येऊ नयेत अशी याचिका दाखल केली. हे प्रकरण उच्च न्यायालयून सर्वोच्च न्यायालयात गेले. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आदेश मिळू नये यासाठी कॅव्हेट दाखल केले. या प्रकरणी राज्य सरकार, महापालिका यांना म्हणणे मांडण्या सांगितले. राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात एक अर्ज केला गेला. त्या अर्जानुसार १८ गावे सोडून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्यास अनुमती द्यावी असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत असे या अर्जाद्वारे म्हणणे मांडले आहे. मात्र याचिकाकर्त्याच्या वतीने वकिलांनी केलेल्या युक्तीवादानुसार गावे वगळण्याचा ठराव महासभेत करणे अपेक्षित आहे. 

केवळ महापालिका आयुक्तांनी दिलेल्या पत्रच्या आधारे गावे वगळण्याचा निर्णय घेता येऊ शकत नाही. तेव्हा राज्य सरकार आणि महापालिका वकिलांनी सध्या सदस्य मंडळाची मुदत संपुष्टात येऊन महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे महासभाच अस्तित्वात नसल्याने महासभेचा ठराव कुठून करणार असा मुद्दा उपस्थित केला गेला. ही सगळी बाजू ऐकून घेत न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार, केडीएमसी आणि याचिकाकर्त्याने दोन पानी महत्वाचे मुद्दे सादर करावेत. त्यानुसार युक्तीवाद केला जाईल. यासाठी २७ जानेवारी रोजी सुनावणीची पुढील तारीख दिले गेली आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने वकील तुषार राजे, महापालिकेच्या वतीने वकील महेश जेठमलानी आणि याचिकाकर्त्याच्या वतीने वकिल दधीची महेशपूरकर यांनी युक्तीवाद केला. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली