शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2025 05:31 IST

४ ठार, ९ जखमी, दोघे गंभीर; मृतांत लाेहमार्ग पोलिस ठाण्याच्या जवानाचा समावेश; मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

अनिकेत घमंडी

डोंबिवली : मुंबईवरून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकणारे प्रवासी परस्परांना धडकल्याने सोमवारी सकाळी मुंब्र्यात झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ जखमी झाले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकी मुख्यदल यांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मुंब्रा स्थानकापाशी जलद मार्गिकांमधील अंतर कमी आहे. सकाळच्या गर्दीमुळे आत शिरण्यास जागाच नसल्याने दोन्ही लोकलच्या दरवाजात प्रवासी लटकत होते. त्यांच्या पाठीवरील बॅगांचा परस्परांना धक्का लागल्यामुळे हा अपघात घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बराच वेळ काय झाले हे कोणालाच समजत नव्हते. काहींना गंभीर जखमा झाल्याने ते रक्तबंबाळ झाले, तर काहींना मुका मार लागल्याने त्यांची अवस्था शरीराची हालचाल करण्या पलिकडे होती. अनेक प्रवासी रुळाजवळच्या  खडीमध्ये पडले होते. असंवेदनशील रेल्वे प्रशासनाने मात्र आपली जबाबदारी झटकत दरवाजातून प्रवास करणाऱ्यांवर खापर फोडले.

जलद मार्गिकेवर ही दुर्घटना घडण्याच्या काही मिनिटे आधी पुष्पक एक्स्प्रेस कल्याणकडे रवाना झाली. त्यामुळे सुरुवातीला त्या एक्स्प्रेसमधील प्रवासी पडल्याची भीती व्यक्त झाली होती. जखमींना ५० हजार ते २ लाख रूपयांची मदत देऊ. उपचाराचा पूर्ण खर्च  सरकार करेल, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

दोन ट्रॅकमध्ये अंतर किती?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार दोन्ही ट्रॅकमधील अंतर ट्रॅकच्या मध्यापासून ५.३ मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूंपासून ३.६ मीटर एवढे असते.  लोकल एकमेकांना क्रॉस करताना सुमारे १.८ मीटर म्हणजे ५ ते ६ फूट अंतर असते. हे अंतर वळणदार भागात देखील तेवढेच असते.

अपघात स्थळी रुळांमधील नेमके अंतर किती? : रुळांमधील अंतर नेमके किती होते, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

जखमी प्रवासी...

आदेश भोईर (२६, रा. आटगाव, कसारा), रिहान शेख (२६, भिवंडी), तुषार भगत (२२), मनीष सरोज (२६ दिवा साबेगाव, दिवा), मच्छिंद्र गोतारणे (३९, वाशिंद), स्नेहा धोंडे (२१, रा. टिटवाळा), प्रियंका भाटिया (२६ रा. शहाड, कल्याण) या सात जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिंताजनक : शिवा गवळी (२३), अनिल मोरे (४०).