शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

रस्त्यावरील डांबर उखडून गेले वाहून; नालंबी मार्गाची दोन वर्षांत दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:37 IST

टँकर, सिमेंट रेडिमिक्स वाहनामुळे मोठ्या अपघाताची भीती

पंकज पाटीलअंबरनाथ : तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे, या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून उल्हास नदीतून बेकायदा पाणी भरून जाणारे टँकर तसेच सिमेंट प्लांटमधून रेडिमिक्स काँक्रिटची वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

ग्रामीण भागातील नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी या रस्त्याने जोडली गेली आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ अंबरनाथ शहरात येत असतात. आधी हा रस्ता सुस्थितीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. २०२१ मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभरदेखील हा रस्ता टिकला नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. संबंधित ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. काम निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खड्डे पडले. 

यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला. अंबरनाथच्या कोहजगावपासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला.अंबरनाथहून टिटवाळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात.

उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामुळे बेकायदा चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांटमधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रिटच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथroad safetyरस्ते सुरक्षा