शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील डांबर उखडून गेले वाहून; नालंबी मार्गाची दोन वर्षांत दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:37 IST

टँकर, सिमेंट रेडिमिक्स वाहनामुळे मोठ्या अपघाताची भीती

पंकज पाटीलअंबरनाथ : तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे, या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून उल्हास नदीतून बेकायदा पाणी भरून जाणारे टँकर तसेच सिमेंट प्लांटमधून रेडिमिक्स काँक्रिटची वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

ग्रामीण भागातील नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी या रस्त्याने जोडली गेली आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ अंबरनाथ शहरात येत असतात. आधी हा रस्ता सुस्थितीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. २०२१ मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभरदेखील हा रस्ता टिकला नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. संबंधित ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. काम निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खड्डे पडले. 

यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला. अंबरनाथच्या कोहजगावपासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला.अंबरनाथहून टिटवाळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात.

उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामुळे बेकायदा चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांटमधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रिटच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथroad safetyरस्ते सुरक्षा