शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

By प्रशांत माने | Updated: March 31, 2024 18:12 IST

१३ तासांनी आग नियंत्रणात आली.

कल्याण: रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केडीएमसीच्या येथील बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की इथला संपूर्ण सूका कचरा जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता तब्बल १३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. दरम्यान आग चोहोबाजुंनी लागल्याने ती लागली की लावली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

बारावे प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रीक टन प्रतिदिन सुका कचरा येतो. त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविला जातो. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविले जाते. या प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० मॅट्रीक टन कचरा साठला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास या कच-याला अचानक आग लागली. रात्रपाळीत याठिकाणी काम करणा-या कामगारांनी लगतच्या असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतू कच-याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन बंब रवाना झाले.

आगीची तीव्रता पाहता सात बंब आणि पाण्याचे १३ टँकर त्याठिकाणी दाखल झाले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मनपाच्या शहरअभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या आगीवर १३ तासात नियंत्रण मिळविले. आगीत प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. प्रकल्पाला भीषण आग लागल्याच्या घटना २०२२ आणि २०२३ मध्येही घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा लागलेल्या आगीत प्रकल्पाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका