शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

By प्रशांत माने | Updated: March 31, 2024 18:12 IST

१३ तासांनी आग नियंत्रणात आली.

कल्याण: रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केडीएमसीच्या येथील बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की इथला संपूर्ण सूका कचरा जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता तब्बल १३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. दरम्यान आग चोहोबाजुंनी लागल्याने ती लागली की लावली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

बारावे प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रीक टन प्रतिदिन सुका कचरा येतो. त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविला जातो. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविले जाते. या प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० मॅट्रीक टन कचरा साठला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास या कच-याला अचानक आग लागली. रात्रपाळीत याठिकाणी काम करणा-या कामगारांनी लगतच्या असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतू कच-याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन बंब रवाना झाले.

आगीची तीव्रता पाहता सात बंब आणि पाण्याचे १३ टँकर त्याठिकाणी दाखल झाले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मनपाच्या शहरअभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या आगीवर १३ तासात नियंत्रण मिळविले. आगीत प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. प्रकल्पाला भीषण आग लागल्याच्या घटना २०२२ आणि २०२३ मध्येही घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा लागलेल्या आगीत प्रकल्पाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका