शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

By प्रशांत माने | Updated: March 31, 2024 18:12 IST

१३ तासांनी आग नियंत्रणात आली.

कल्याण: रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केडीएमसीच्या येथील बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की इथला संपूर्ण सूका कचरा जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता तब्बल १३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. दरम्यान आग चोहोबाजुंनी लागल्याने ती लागली की लावली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

बारावे प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रीक टन प्रतिदिन सुका कचरा येतो. त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविला जातो. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविले जाते. या प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० मॅट्रीक टन कचरा साठला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास या कच-याला अचानक आग लागली. रात्रपाळीत याठिकाणी काम करणा-या कामगारांनी लगतच्या असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतू कच-याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन बंब रवाना झाले.

आगीची तीव्रता पाहता सात बंब आणि पाण्याचे १३ टँकर त्याठिकाणी दाखल झाले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मनपाच्या शहरअभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या आगीवर १३ तासात नियंत्रण मिळविले. आगीत प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. प्रकल्पाला भीषण आग लागल्याच्या घटना २०२२ आणि २०२३ मध्येही घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा लागलेल्या आगीत प्रकल्पाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका