शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

By प्रशांत माने | Updated: March 31, 2024 18:12 IST

१३ तासांनी आग नियंत्रणात आली.

कल्याण: रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केडीएमसीच्या येथील बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की इथला संपूर्ण सूका कचरा जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता तब्बल १३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. दरम्यान आग चोहोबाजुंनी लागल्याने ती लागली की लावली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

बारावे प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रीक टन प्रतिदिन सुका कचरा येतो. त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविला जातो. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविले जाते. या प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० मॅट्रीक टन कचरा साठला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास या कच-याला अचानक आग लागली. रात्रपाळीत याठिकाणी काम करणा-या कामगारांनी लगतच्या असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतू कच-याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन बंब रवाना झाले.

आगीची तीव्रता पाहता सात बंब आणि पाण्याचे १३ टँकर त्याठिकाणी दाखल झाले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मनपाच्या शहरअभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या आगीवर १३ तासात नियंत्रण मिळविले. आगीत प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. प्रकल्पाला भीषण आग लागल्याच्या घटना २०२२ आणि २०२३ मध्येही घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा लागलेल्या आगीत प्रकल्पाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगkdmcकल्याण डोंबिवली महापालिका