शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By अनिकेत घमंडी | Updated: October 18, 2022 15:17 IST

छत्रपती शिक्षण संस्थेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी लिहिली पंतप्रधानांना "धन्यवाद पत्र"

कल्याण (प्रतिनिधी) आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला असून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवून देश उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.  

छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर शाळेत झालेल्या धन्यवाद मोदी उपक्रमात कपिल पाटील बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष एन के फडके, भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे, भारती वेदपाठक, संस्थेचे मार्गदर्शक बाबा जोशी, माजी सरचिटणीस मनोहर ठाकुरदेसाई, कार्यकारणी सदस्य किशोर आल्हाट, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.

पुढील २० वर्षाचा वेध घेत देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले, देशातील शाळा अद्ययावत व्हाव्यात यासाठी देशभरातील १४ हजाराहून अधिक "पीएम श्री शाळा" करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून शिक्षणाच्या माध्यमातून देशाला महासत्ता बनविण्याचे पंतप्रधानांनी ठरविले असल्याचे कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करतांना सांगितले.  छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिक्षण संस्था नागरी, सागरी तसेच वनवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करीत असून अनेक अडचणींवर मात करून संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवीत असल्याचे डॉ नंदकिशोर जोशी यांनी सांगितले.

अनिल बोरनारे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे लिहून पंतप्रधानांना पोहचविण्याचे भाजपाचे धन्यवाद, मोदीजी अभियान सुरू केले आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या  पुढाकाराने शैक्षणिक लाभार्थी विद्यार्थ्यांचे पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू केला असून छत्रपती शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थी व इतर शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांनी मोदींजींना पत्रे लिहिली ही पत्रे एका व्हॅन ने प्रदेश कार्यालयाला पाठविली जाणार असून त्या व्हॅन ला हिरवा झेंडा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दाखविला. 

लवकरच ठाणे जिल्ह्यातून अजून २५ हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थी लिहिणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य एन के फडके तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते यांनी मांडले. संस्थेचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे व इतर पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील