शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक : नंदिनी जाधव

By सचिन सागरे | Updated: November 7, 2023 17:06 IST

डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत.

कल्याण : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर संमत झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणे अत्यावश्य असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव यांनी येथे व्यक्त केले. डॉ. दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनी २० ऑगस्ट रोजी पुणे येथून सुरू केलेल्या जादूटोणाविरोधी राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने कल्याण येथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपले विचार मांडले.

डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात दिड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. आजूबाजूला समाजात घडणाऱ्या घटनांची संख्या पाहता दाखल गुन्ह्यांची संख्या ही फार कमी आहे आणि म्हणूनच या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र, मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहे. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा अशी मागणी जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने जाधव यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त गणेश चिंचोले, राज्य सल्लागार मंडळाचे सदस्य श्यामकांत जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष डी. जे. वाघमारे, ठाणे जिल्हा सचिव अश्विनी माने यांच्यासह जिल्हा व राज्य विभाग सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर