शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 15:30 IST

आयुक्तांच्या आदेशानुसार बल्याणी परिसरात रस्ता खचल्याने पावसाचे पाणी परिसरातील चाळींमध्ये शिरले होते.

कल्याण- गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग क्षेत्र अधिका:यांना दिले आहेत. पाणी साचलेल्या परिसरात जंतूनाशक, डास अळी नाशक, दुर्गंधीनाशक फवारणी करण्यात यावी. पावसाचे पाण्याचा निचरा झाल्यावर घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य निरिक्षकांनी फवारणी करावी. 

आयुक्तांच्या आदेशानुसार बल्याणी परिसरात रस्ता खचल्याने पावसाचे पाणी परिसरातील चाळींमध्ये शिरले होते. त्याठिकाणी प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी फवारणी केली आहे. पिसवली, तुकाराम चौक, विको नाका, समतानगर, देशमुख होम्स, दावडी रोड, गोळवळी परिसरातही पाणी साचले होते. कांचन गाव, दिनेशनगर या चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर नांदीवली, समर्थनगर, भोपरनाला, गांधीनगगर परिसरात साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑईल फवारणी केली आहे. यासाठी प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

उर्वरीत भागातही पावसाच्या पाण्याचा निचरा होताच फवारणी करण्यात येणारअसल्याचे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी सांगितले. फवारणीसाठी चार जीप धुरावणीचे 31 हॅण्ड पंप, 10 मल्टीजेट ट्रॅक्टर, 122 जंतूनाशक फवारणीचे हॅण्ड पंप यांचा वापर करुन फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या भागातून पावसाळी संसर्गजन्य साथीचे आजार फसरु शकतात. त्यासाठी ही खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी अधिकारी वर्गास बजावले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका