शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

या भटक्या कुत्र्यांना कोणी तरी आवरा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 09:53 IST

माणसाळलेल्या, प्रशिक्षित आणि  पाळलेल्या कुत्र्यांच्या इथे प्रश्न नाही.

राजेश पिल्लेवार, वृत्त संपादक

टिटवाळ्याच्या रिजन्सी सर्वम सोसायटीचा तो भयानक व्हिडीओ तुम्ही बघितलाय का? चार भटक्या कुत्र्यांची टोळी एका वृध्द असहाय महिलेवर हल्ला चढवते. तिच्या अंगावरील कपडे ओरबाडून टाकतात. तिच्या शरीराचे लचके तोडतात. तिला ५० मीटरपर्यंत फरफटत नेतात. सुदैवानं काही लोकांचं लक्ष जातं आणि ते धावतात. पण तोपर्यंत तिच्या अंगावर गंभीर जखमा झालेल्या असतात. तिला लगेच इस्पितळात हलवण्यात येतं. आता तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अतिशय चीड आणणारी ही घटना.

सोशल मीडियातून ती सर्वत्र पसरली. लोकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी रोष व्यक्त केला. कुणी सरकारवा बोल लावले तर कोणी प्राणिमित्रांच्या नावाने बोटे मोडली. बरं, भटक्या कुत्र्यांनी सामान्य लोकांवर हल्ला चढविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का? वाघबकरी या प्रसिद्ध चहाचे मालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने लहान मुलांना घेरून त्यांचे लचके तोडल्याच्या अनेक घटना अधूनमधून कानावर पडतात. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडले आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. 

माणसाळलेल्या, प्रशिक्षित आणि  पाळलेल्या कुत्र्यांच्या इथे प्रश्न नाही. त्यांच्या बाबतीत जर काही घडले तर संबंधित मालक त्यासाठी जबाबदार असतात. प्रश्न आहे तो रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांचा. कोण आहे या अशा कुत्र्यांचा पोशिंदा? या कुत्र्यांच्या संख्यावाढीसाठी कोणाला जबाबदार धरायचे? लहान मुले, एकटी-दुकटी वृध्द मंडळी, रात्री जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून जाणारे दुचाकीस्वार यांच्या जीवावर उठलेल्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवायचे तरी कुणी? बरं, धडधाकट माणसालाही अशा कुत्र्यांची भीती असतेच. गल्लोगल्ली अशा भटक्या कुत्र्यांच्या मोठाल्या टोळ्या ठाण मांडून आहेत. त्यांना खाऊ पिऊ घालणारे कनवाळू आहेत. दिवसागणिक ही मोठी गंभीर समस्या होत चालली आहे, हे मान्य करून या समस्येकडे बघावे लागेल. मुळात ही समस्या आहे, हे आधी मान्य करावे लागेल. २०३० पर्यंत देश रेबिजमुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणा अशा सगळ्यांना हातात हात घालून काम करावे लागेल. नसबंदीच्या खर्चावर उपाय बघावा लागेल. जगात नेदरलँड हा एकमेव भटक्या कुत्र्यांपासून मुक्त असा देश आहे. त्यांनी काय केले, त्याचा अभ्यास करावा लागेल. तरच या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागू शकेल.

कायदा काय सांगतो?

पहिला क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० साली झाला. २००२ मध्ये त्यातील दुरुस्तीनुसार भटकी कुत्री देशाचे मूळ रहिवासी आहेत. कलम ४२८ आणि ४२९ नुसार, भटक्या कुत्र्यावर अत्याचार केले, ठार मारले किंवा अपंग केले तर आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.

१.८४ कोटी भारतीयांना दरसाल कुत्री चावा घेतात. ३६ टक्के जगात रेबिजने मृत्यू होण्याच्या एकट्या भारतातील घटना. रेबिजमुळे सर्वाधिक मृत्यू १५ वर्षांखालील मुलांचे होतात.

 

टॅग्स :dogकुत्रा