शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका

By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2024 19:57 IST

केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.

कल्याण - काँग्रेस ही गेल्या अनेक निवडणूकीत गरीबी हटावचा नारा देत आली आहे. काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी आहे. मात्र खऱ्या अर्थाने गरीबी हटविण्याचे काम मोदी सरकारने केले. काँग्रेस जर सत्तेवर आली तर धर्माच्या आधारे बजेट तयार करेल. काँग्रेस विकास करु शकतन नाही. केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार लढविणारे श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील उमेदवार कपील पाटील यांच्या संयुक्त प्रचारार्थ आज व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान मोदी यांची जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपरोक्त टिका केली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे, आमदार किसन कथोरे, राजू पाटील, विश्वनाथ भोईर, संजय केळकर, बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस नेहमी हिंदू मुस्लीमांचे राजकारण करीत आली आहे. त्यांच्या या बेमाईमानीचा कच्चा चिठ्ठा मी खुला केला आहे. यूपीए सरकारने मुस्लीमानांकरीता १५ टक्के बजेट तयार केले होते. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या धर्मावरील आधारीत बजेटला सगळ्यात प्रथम मी विरोध केला होता.

मोदी यांनी सांगितले की, सत्ता स्थापन झाल्यावर १०० दिवसात काय करायचे याचे नियोजन माझ्याकडे आहे. पण देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांना या प्रक्रियेत मी जोडून घेणार आहे. त्यांनी त्याच्या काही चांगल्या संकल्पना मला कळवाव्यात त्याची छाननी करुन चांगल्या सूचना विचारात घेऊन १०० दिवसांच्या नियोजनात आणखीन २५ दिवस जोडून घेतले जातील. १२५ दिवसात केल्या जाणाऱ्या कामातच २०४७ सालच्या संकल्प सिद्धीला बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या सत्तेत देशाच्या विकासाला ब्रेक लागला होता. २०१४ सालानंतर आम्ही सत्तेवर आल्यापासून विकासाचे सर्व ब्रेक हटवून देशाला टा’प गेअरमध्ये आणले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हरिवंश राय बच्चन यांच्या अग्नीपथ या कवितेच्या ओळी सादर करुन पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची स्तूती केली. त्याचबरोबर उबाठा हा पाकिस्तानची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत. कमरेचे सोडून डोक्याला बांधणाऱ्यांना लाच कसली अशी टिका ठाकरे सेनेवर केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी संविधान बदलले जात असणार असल्याचा अपप्रचार इंडिया आघाडीकडून केला जात आहे. हा प्रचार चुकीचा आणि निराधार आहे. त्याला बळी पडू नका असे आवाहन केले.

टॅग्स :kalyanकल्याणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस