शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिका

By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2024 19:57 IST

केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.

कल्याण - काँग्रेस ही गेल्या अनेक निवडणूकीत गरीबी हटावचा नारा देत आली आहे. काँग्रेसचा गरीबी हटावचा नारा म्हणजे अफूची गोळी आहे. मात्र खऱ्या अर्थाने गरीबी हटविण्याचे काम मोदी सरकारने केले. काँग्रेस जर सत्तेवर आली तर धर्माच्या आधारे बजेट तयार करेल. काँग्रेस विकास करु शकतन नाही. केवळ हिंदू मुस्लिमान आधारीत राजकारणार करु शकते, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार लढविणारे श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील उमेदवार कपील पाटील यांच्या संयुक्त प्रचारार्थ आज व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान मोदी यांची जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपरोक्त टिका केली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे, आमदार किसन कथोरे, राजू पाटील, विश्वनाथ भोईर, संजय केळकर, बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस नेहमी हिंदू मुस्लीमांचे राजकारण करीत आली आहे. त्यांच्या या बेमाईमानीचा कच्चा चिठ्ठा मी खुला केला आहे. यूपीए सरकारने मुस्लीमानांकरीता १५ टक्के बजेट तयार केले होते. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या धर्मावरील आधारीत बजेटला सगळ्यात प्रथम मी विरोध केला होता.

मोदी यांनी सांगितले की, सत्ता स्थापन झाल्यावर १०० दिवसात काय करायचे याचे नियोजन माझ्याकडे आहे. पण देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांना या प्रक्रियेत मी जोडून घेणार आहे. त्यांनी त्याच्या काही चांगल्या संकल्पना मला कळवाव्यात त्याची छाननी करुन चांगल्या सूचना विचारात घेऊन १०० दिवसांच्या नियोजनात आणखीन २५ दिवस जोडून घेतले जातील. १२५ दिवसात केल्या जाणाऱ्या कामातच २०४७ सालच्या संकल्प सिद्धीला बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या सत्तेत देशाच्या विकासाला ब्रेक लागला होता. २०१४ सालानंतर आम्ही सत्तेवर आल्यापासून विकासाचे सर्व ब्रेक हटवून देशाला टा’प गेअरमध्ये आणले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हरिवंश राय बच्चन यांच्या अग्नीपथ या कवितेच्या ओळी सादर करुन पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची स्तूती केली. त्याचबरोबर उबाठा हा पाकिस्तानची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत. कमरेचे सोडून डोक्याला बांधणाऱ्यांना लाच कसली अशी टिका ठाकरे सेनेवर केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी संविधान बदलले जात असणार असल्याचा अपप्रचार इंडिया आघाडीकडून केला जात आहे. हा प्रचार चुकीचा आणि निराधार आहे. त्याला बळी पडू नका असे आवाहन केले.

टॅग्स :kalyanकल्याणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस