शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसी मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: January 23, 2023 18:24 IST

महापलिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरीकांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन दिले गेले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेतले गेले होते. 

कल्याण : नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यावर कल्याण डोंबिवली प्रशासनाकडून कोणते ठोस पाऊल उचलले जात नसल्याने आज जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन केले.

फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पदाधिकारी चेतना रामचंद्रन, मनसेचे महेंद्र कुंदे, आपचे धनंजय जोगदंड, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर आदींनी मूक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन केले गेले. फाऊंडेशनच्या वतीने डिसेंबर महिन्यात महापालिका मुख्यालयासमोर सलग आठ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले गेले. त्यानंतर महापलिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरीकांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन दिले गेले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेतले गेले होते. 

पंधरा दिवसात संबंधित विभागानी अहवाल सादर करण्याचे आदेश चितळे यांनी दिले होते. हे आश्वासन २९ डिसेंबर रोजी दिले होते. डिसेंबरपासून पंधरा दिवसाची मुदत १२ जानेवारीला संपुष्टात आली. त्यानंतरही अहवाल देण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आजपासून फाऊंडेशने पुन्हा दररोज ३ ते ५ या कार्यालयीन वेळेत मूक धरणे आंदोलन सुरु केले आहे. २६ जानेवारीनंतर हे आंदोलन सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत केले जाणार आहे, असे घाणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण