शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

By मुरलीधर भवार | Updated: June 9, 2023 15:17 IST

माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे.

कल्याण - शहरातील पश्चिम भागातील बेतूरकपाडा, ठाणकरपाडा आणि फडके मैदान परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. कमी दाबाने येणारे पाणी देखील दूषित असते. या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करुनदेखील समस्या सूटत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या दिला.

माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे. पाणी दूषित येते. नागरीकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर या संदर्भात उगले यांनी आयुक्तांची चार वेळा भेट घेतली. याशिवाय अभियंत्याकडेही हा विषय मांडून झाला. तरी देखील समस्या सूटत नाही. अखेरीस त्यांनी आज कार्यकारी अभियंता मोरे यांचे दालन गाठले. दालनाता कुलूप असल्याने त्यांनी त्याठीकाणी ठिय्या दिला. काही वेळेत मोरे येताच त्यांना दालनात जाण्यापासून उगले यांनी मज्जाव केला. जोपर्यंत समस्या सूटत नाही. तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही असा इशारा दिला.

या समस्येविषयी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना कल्पना दिली आहे. गेल्या पाच दिवसापासून नागरीकांना पाणी आलेले नाही. जे नागरीक पाण्याचे बिल नियमित भरतात. पाणी मिळत नसल्याने या भागाला महापालिकेने पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवावे अशी मागणी केली असता. त्याला पैसे लागतील असे सांगण्यात येते. हा अजब प्रकार आहे. आज रात्रीपर्यंत ही समस्या सुटणार असे आश्वासन दिल्यावर उगले यांनी ठिय्या मागे घेतला. दरम्यान कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले की, वा’ल ना दुरुस्त झाला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर हाती घेतले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाwater shortageपाणीकपात