शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2024 17:41 IST

राजकीय चर्चांना उधाण... ग्रामीणमध्ये होणार तिहेरी लढत? 

मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली शहरातलं राजकारण राज्यामध्ये कायमच चर्चेचा विषय राहिलाय. लोकसभा निवडणुका झाल्या मात्र आता विधानसभेमध्ये राजकीय फटाके फुटणार असे चित्र दिसून येते .त्यातच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटातील अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातेय. एकीकडे कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ मनसेकडे आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे या विधानसभेचे नेतृत्व करतायेत. मनसेने लोकसभेला खासदार शिंदेंना दिलेला  पाठिंबा आणि आता विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कल्याण ग्रामीण बाबत नेमकं शिंदेंची शिवसेना  आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राजेश मोरे हे सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले. तेव्हापासून शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शांत, संयमी आणि पक्ष बांधणीचे कसब असलेले मोरे यांना सभागृह नेतेपद सुद्धा देण्यात आले. त्यानंतर डोंबिवली शहर प्रमुख पदही पक्षाने त्यांना दिले. डोंबिवली शहरामध्ये राजेश मोरे यांचा चांगला जनसंपर्क आहे. कल्याण ग्रामीणचा बऱ्यापैकी भाग हा डोंबिवली शहराला लागून आहे जवळपास ३१ प्रभाग डोंबिवली मध्ये येतात आणि या ठिकाणी राजेश मोरे यांचे  पारडे जड असल्याचे  त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे.

कल्याण ग्रामीण मध्ये निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी तयारीला सुरुवात केली असून घराघरात जाऊन चाचणी केली जात आहे त्याचप्रमाणे मतांची गणित जुळवण्याचा सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राजेश मोरे यांना संपर्क साधला असता आपण कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची गोष्ट त्यांनी मान्य केली मात्र भविष्यात वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं.

तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचा सुद्धा नाव आघाडीवर असून भोईर यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. पण शिवसेना शिंदे गट इथून निवडणूक लढवणार का की या विधानसभेत बंडखोरी होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. राजू पाटील,  सुभाष भोईर ,राजेश मोरे हे सर्व  भावी उमेदवार आगरी समाजाचे असल्याने  आगरी मतांचं विभाजन या ठिकाणी होणार हे मात्र नक्की पण इतर भाषिकांचा कल हा नेमका कोणत्या पक्षाला जातो की उमेदवार बघून मतदार मतदान करतात ? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल...

टॅग्स :kalyanकल्याणkalyan-rural-acकल्याण ग्रामीणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण