शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2024 17:41 IST

राजकीय चर्चांना उधाण... ग्रामीणमध्ये होणार तिहेरी लढत? 

मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली शहरातलं राजकारण राज्यामध्ये कायमच चर्चेचा विषय राहिलाय. लोकसभा निवडणुका झाल्या मात्र आता विधानसभेमध्ये राजकीय फटाके फुटणार असे चित्र दिसून येते .त्यातच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटातील अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातेय. एकीकडे कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ मनसेकडे आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे या विधानसभेचे नेतृत्व करतायेत. मनसेने लोकसभेला खासदार शिंदेंना दिलेला  पाठिंबा आणि आता विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कल्याण ग्रामीण बाबत नेमकं शिंदेंची शिवसेना  आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राजेश मोरे हे सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले. तेव्हापासून शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शांत, संयमी आणि पक्ष बांधणीचे कसब असलेले मोरे यांना सभागृह नेतेपद सुद्धा देण्यात आले. त्यानंतर डोंबिवली शहर प्रमुख पदही पक्षाने त्यांना दिले. डोंबिवली शहरामध्ये राजेश मोरे यांचा चांगला जनसंपर्क आहे. कल्याण ग्रामीणचा बऱ्यापैकी भाग हा डोंबिवली शहराला लागून आहे जवळपास ३१ प्रभाग डोंबिवली मध्ये येतात आणि या ठिकाणी राजेश मोरे यांचे  पारडे जड असल्याचे  त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे.

कल्याण ग्रामीण मध्ये निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी तयारीला सुरुवात केली असून घराघरात जाऊन चाचणी केली जात आहे त्याचप्रमाणे मतांची गणित जुळवण्याचा सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राजेश मोरे यांना संपर्क साधला असता आपण कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची गोष्ट त्यांनी मान्य केली मात्र भविष्यात वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं.

तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचा सुद्धा नाव आघाडीवर असून भोईर यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. पण शिवसेना शिंदे गट इथून निवडणूक लढवणार का की या विधानसभेत बंडखोरी होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. राजू पाटील,  सुभाष भोईर ,राजेश मोरे हे सर्व  भावी उमेदवार आगरी समाजाचे असल्याने  आगरी मतांचं विभाजन या ठिकाणी होणार हे मात्र नक्की पण इतर भाषिकांचा कल हा नेमका कोणत्या पक्षाला जातो की उमेदवार बघून मतदार मतदान करतात ? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल...

टॅग्स :kalyanकल्याणkalyan-rural-acकल्याण ग्रामीणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण