शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:57 IST

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते.

कल्याण : टोलनाके बंद करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतलेली नाही. ही याचिका करणारे तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. प्रथम याचिकाकर्ता या नात्याने टोलवसुली बंद करण्याबाबत मंत्री या नात्याने शिंदे यांना पत्र देण्याचे व त्यावर शिंदे यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे आपली याचिका न्यायालयाने निकाली काढली, अशी माहिती याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते. ही याचिका मागे घेतलेली नाही. घाणेकर यांनी एक अधिकृत पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांना द्यायचे, असे म्हटले होते. त्यावर संबंधित खात्याचे मंत्री या नात्याने शिंदे यांनी निर्णय घ्यावा,  असे न्यायालयाने म्हटले होते. 

याचिकेत या टोलनाक्यांचा उल्लेख- याचिकेत समाविष्ट असलेल्या  खारेगाव, भिवंडी, कल्याण शीळ आणि घाेडबंदर, ठाणे हे टोलनाके बंद आहेत. मात्र मुंबई एन्ट्री पॉईंटमध्ये असलेले पाचही टोलनाके तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हे दोनच टोलनाके विचाराधीन आहेत. - प्रकल्पातील कंत्राटदार खरी आकडेवारी जाहीर करतो की नाही, याची खातरजमा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त सचिव आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली होती. त्यांनी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतर सुमित मलिक यांनी हा अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल सदोष असल्याचे समाेर आले हाेते. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे