शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरणाच्या हालचाली पुन्हा सुरू, कुशिवली धरण आरक्षित करण्याची आमदारांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: December 7, 2023 16:47 IST

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली.

कल्याण- कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. ज्याला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते. या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

कल्याण डोंबिवलीतील नागरीकरण वाढत असताना मूलभूत सोयी सुविधांवर येत आहे.त्यामुळे शहरातील बऱ्याचशा नव्या गृह संकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली. 

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही वेळ न घालविता ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देत जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्या यावी. त्यानुसार नुकतीच या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील तीस वर्षातील कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.

भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही आवश्यक बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात स्वतंत्र धरण आरक्षीत करण्याचा निर्णय घेतील असा विश्वास आमदार भोईर यांनी व्यक्त केला आहे.

शहराची लोकसंख्या २० लाखाच्या घरात आहे. या लोकसंख्येनुसार प्रति दिन ४२३ दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील तीस वर्षांचा टप्प्या टप्प्याने विचार करता २०३४ मध्ये लोकसंख्या ३४ लाख ९० हजार आणि प्रतिदिन गरज ६१६ दशलक्षलीटर, २०४२ मध्ये ५० लाख ८८ हजार आणि प्रतिदिन गरज ८९८ दशलक्षलीटर तर २०५२ मध्ये लोकसंख्या ७४ लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज १ हजार ३१० दशलक्ष लिटर भासणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण