शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रिक्षा वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विलंब शुल्क ५० रुपये प्रतिदिन आकारणी निर्णय मागे घ्या!

By अनिकेत घमंडी | Updated: May 28, 2024 19:56 IST

डोंबिवली रिक्षा संघटना कृती समितीची परिवहन आयुक्तांकडे मागणी 

डोंबिवली: केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व संदर्भीय परिवहन आयुक्तांच्या कार्यालयीन पत्रानुसार रिक्षा चालकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विलंब शुल्क ५० रुपये प्रतिदिन प्रमाणे आकारणी सुरू केली आहे. ते विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी शहरातील रिक्षा युनियन पदाधिकारी एकत्र येऊन केलेल्या रिक्षा चालक कृती समितीने मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली, त्यांनी परिवहन आयुक्त आणि स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांना पत्र दिले. 

हे विलंब शुल्क हे केंद्र शासनाची अधिसूचना १६ डिसेंबर २०१६ पासून लागू केल्यामुळे ज्या रिक्षा चालकांनी आपल्या अडीअडचणी मुळे योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नुतनीकरण केले नाही त्या रिक्षा चालकांना पाच हजार ते सत्तर,ऐंशी हजारापर्यंत विलंब शुल्क भरावे लागणार आहे, जे रिक्षा चालकांना शक्य नाही. त्यांनी निवेदनात म्हंटले की, कोरोना काळात रिक्षा बंद असल्या कारणाने तेव्हापासून अनेक रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नुतनीकरण झालेले नाही. कोरोना काळापासून अनेक रिक्षांचे कर्ज थकीत आहे.अनेक रिक्षा कर्जाच्या थकबाकीमुळे बँकांनी/फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या आहेत. 

पेट्रोल,डीझेल, सीएनजी गँस दोन तीन पटीने वाढल्याने व रिक्षाची किंमत, स्पेअर पार्ट सुद्धा अनेक पटीने महाग झाल्यामुळे व रिक्षा दुरुस्तीचा खर्च भरमसाठ वाढल्यामुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची महागाई अनेक पटीने वाढल्यामुळे बारा ते चौदा तास रिक्षा चालवून सुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे मुश्कील झाल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. त्यामुळे रिक्षाचालक खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन सावकारी कर्जाच्या खाईत डुबलेला आहे. 

शासनाने देखील रिक्षाचे प्रवासी भाडे महागाई निर्देशांक नुसार वाढविले नसल्यामुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न घटले आहे. या सर्व कारणांमुळे काही रिक्षाचालक दारिद्र्य रेषेखाली व अत्यंत गरीबीच्या खाईत गेल्यामुळे त्यांची भयंकर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रिक्षा चालकांच्या या गंभीर परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, आँटो रिक्षांसाठी योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क आकारणी रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजप प्रणित वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर, शेखर जोशी आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली