शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील ते धोकादायक रेल्वे रूळ काढले

By पंकज पाटील | Updated: August 25, 2023 19:07 IST

गेल्या काही वर्षांपासून मालगाडीचा वापर बंद झाल्याने हे रेल्वे रूळ तसेच पडीक अवस्थेत होते.

अंबरनाथ: कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणारे रेल्वे रूळ धोकादायक अवस्थेत असल्यामुळे हे रेल्वे रूळ काढण्याचे काम ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. हे रेल्वे रूळ काढल्यानंतर कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अपघातांची मालिकेला काहीसा ब्रेक लागणार आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचे बांधकाम करीत असताना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वारासमोर रेल्वे रूळ आडवे आले होते. मात्र ते रेल्वे रूळ कापण्यास परवानगी न मिळाल्याने संबंधित ठेकेदाराने आहे त्या स्थितीतच रेल्वे रुळावर काँक्रीटचा थर टाकून रस्ता बनवला होता. मात्र ऑर्डर्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या वळणावर रेल्वे रुळावर जे पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते ते निघाल्याने हा मार्ग धोकादायक झाला होता.

एवढेच नव्हे तर अनेक दुचाकी स्वार या रेल्वे रुळात अडकून अपघात ग्रस्त झाले होते. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली. त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र तरी देखील हा धोका कमी होत नसल्याने अखेर ऑर्डर फॅक्टरी प्रशासनाने रेल्वे रूळ कापून हा रस्ता सुस्थितीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पूर्वी मालगाडीने संरक्षण विभागाला लागणारे साहित्याची वाहतूक केली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालगाडीचा वापर बंद झाल्याने हे रेल्वे रूळ तसेच पडीक अवस्थेत होते. त्यामुळे हे रेल्वे रूळ कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी आता पुढे येत आहे. तर दुसरीकडे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरीनेच पुढाकार घेऊन रेल्वे रूळ कापल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केला आहे