शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर ही आवई, पर्यावरणवाद्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 00:53 IST

डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील २० कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या चर्चेमुळे औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता असली तरी पर्यावरणवादी कार्यकर्ते ही उद्योजकांनी उठवलेली आवई असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.

 कल्याण - डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील २० कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या चर्चेमुळे औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता असली तरी पर्यावरणवादी कार्यकर्ते ही उद्योजकांनी उठवलेली आवई असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. वसाहतीमधील काही कारखाने रासायनिक प्रदूषण करीत असून त्याविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यामुळे कारखान्यांच्या मालकांनी स्थलांतराची आवई उठविल्याचे पर्यावरण विषयक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र सर्वेक्षणांच्या नावाखाली कंपन्यांची छळवणूक सुरू असल्याने काही कंपन्या निघून जात असल्याचे ‘कामा’ संघटनेचे म्हणणे आहे.रासायनिक, इंजिनीअरिंग, औषध निर्माण क्षेत्रातील २० कंपन्या स्थलांतरित होत असल्याला कामाने दुजोरा दिला. डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४२० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांचे मालक कंपन्या विकण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अन्य कुणी कंपन्या विकत घेतल्यावर पुन्हा त्यांना त्रास होणार आहे. त्यापेक्षा कंपन्या परराज्यात स्थलांतरित करणे योग्य, असा विचार काहींनी केला आहे. विविध सरकारी संस्थांकडून सर्वेक्षणाच्या नावाखाली कंपनी मालकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांना तोंड द्यायचे की उत्पादन करायचे? अशा कात्रीत कंपनी मालक सापडले होते. त्यामुळे त्यांनी कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. मात्र नेमक्या कोणत्या कंपन्या स्थलांतरित होत आहेत, याविषयी अधिक माहिती सोनी यांनी दिली नाही. २० कंपन्या अन्य राज्यात गेल्या तर जवळपास एक हजार कामगार बेरोजगार होतील, याकडे सोनी यांनी लक्ष वेधले.माहिती अधिकाराचे कार्यकर्ते व पर्यावरणवादी राजू नलावडे म्हणाले की, डोंबिवलीतील कंपन्या स्थलांतरित होत असतील तर ही गंभीर बाब आहे. कोणत्या कंपन्या स्थलांतरित होत आहेत त्यांची नावे ‘कामा’ने जाहीर करायला हवीत. मात्र नावे गुलदस्त्यात ठेवून केवळ कामगारांच्या बेरोजगारीबाबत बोलणे याचा अर्थ हे उद्योजकांचे दबावतंत्र आहे. एमआयडीसीत अनेक रासायनिक कारखाने प्रदूषण करतात. सुरक्षेच्या उपाययोजना करीत नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला तर असा दबाव टाकतात.दरम्यान, कामा संघटनेच्या पुढाकाराने कंपनी मालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची भेट घेतली. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. ‘कामा’चे प्रतिनिधी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि एमआयडीसीचीही भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीनंतर उद्योग स्थलांतराच्या निर्णयावर ठाम राहतात की निर्णय बदलतात हे स्पष्ट होईल.कंपन्यांचे पुन्हा सर्वेक्षण सुरू प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुढे आली होती.  प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयासह राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका  न्यायप्रविष्ट आहेत.   सुरक्षितता आणि प्रदूषण रोखण्यासाठी नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तेव्हा ३०२ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. आता पुन्हा हे सर्वेक्षण सुरू केेले आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी