शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:56 IST

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनिकेत घमंडी 

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कल्याण कसारा मार्गावरील प्रवाशाने ते ट्विट केले असून त्या मार्गावर तिसर्या मार्गिकेचे काम २०१२ नंतर आता ९ वर्षात अवघे २७ टक्केच पुढे गेले असल्याबद्दल प्रवाशाने नाराजी दर्शवली.

उमेश विशे असे त्यांचे नाव असून ते एका प्रवासी संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत. कोविड काळात रेल्वे प्रवास नसल्याने सामान्य नागरिक पिचला असून त्याला कोणीही वाली नाही. त्यात रस्ते धड नसल्याने तो वाहतुकीचा पर्याय देखील खर्चिक आणि वेळखाऊ होत असल्याने नागरिक राज्य शासनावर तसेच केंद्र स्तरावर खूप नाराज आहेत.

सातत्याने त्यासंदर्भात मागण्या करून, पत्र पाठवून देखील त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यात।केंद्र राज्य यांमधील राजकीय द्वंद्व संपता संपत नसल्याने त्यात सामान्य नागरिक भरडला जात आहे. दानवे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच त्यांनी मुंबईची लोकल सामान्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आम्ही वरिष्ठ पातळीवर दिल्लीत प्रयत्न करू असे म्हंटले होते. तसेच मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्थानकात जाऊन सर्वत्र जाऊन परिस्थिती जाणून घेणार असल्याचे म्हंटले होते. पण त्याचा अद्याप शुभारंभ झाला नाही का असा सवाल प्रवाशांनी विचारला होता. कल्याण।कसारा, कल्याण कर्जत या मार्गावर सध्या दोन मार्गिका आहेत त्यात तिसरी, चौथी मार्गिका करण्याचे नियोजन सुरू आहे. पण त्याला वर्षानुवर्षे उलटली तरीही प्रगती मात्र होत नसल्याने दिवसेंदिवस प्रवास जीवघेणा होत आहे.

एवढ्या वर्षात अवघे २७ टक्के प्रकल्प।पुढे सरकला असल्याने प्रवासी खूप नाराज आहेत. त्यामुळे तातडीने मार्गिकेचे काम हाती घ्यावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा दानवे यांच्याकडून असल्याचे विशे यांचे म्हणणे आहे. ट्विट हे प्रभावी माध्यम असून थेट संदेश मिळावा यासाठी मागणी व अपेक्षा मांडून व्यथा व्यक्त करण्यात आली. त्याला समाज माध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत असून प्रवाशांच्या भावनांना वाचा फोडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMumbai Localमुंबई लोकलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली